शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; जानवलीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहतूक कोंडी

By सुधीर राणे | Updated: May 18, 2024 14:00 IST

महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

कणकवली : कणकवली पासून जवळच मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेनजीक रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला कारने दिलेल्या धडकेत अनिल कृष्णा कदम (वय ५६, रा. जानवली बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला चौवीस तास उलटून गेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या कारचालकाला पोलिस अटक करत नाही, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त जानवली ग्रामस्थानी महामार्गावर 'रास्ता रोको' केला. तीन तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. महामार्गावर वारंवार अपघात होवून त्यात अनेक बळी जात आहेत.त्याला महामार्ग प्राधिकरण जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका  मांडली.मृत अनिल कदम हे गवंडी काम करत होते.  शुक्रवारी सकाळी ते मुंबई गोवा महामार्गावरून चालत कामावर जात होते. त्यादरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या परमिट कारने त्यांना धडक दिली होती. त्यानंतर तो कारचालक तिथे न थांबता गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेला. ही धडक एवढी जोरदार होती की अनिल कदम त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यामुळे जानवली ग्रामस्थ आक्रमक झाले.

गुरुवारी कणकवली पोलिस ठाण्यास भेट देत अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला लवकरात लवकर ताब्यात घेवून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा पोलिसांना दिला होता. तर शनिवारी सकाळ पासून जानवली येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गAccidentअपघातagitationआंदोलन