शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शिवसेनेवरील आरोप दिशाभूल करणारे, भाजप आमदारांची घोषणा फसवी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:33 IST

पडवे मेडिकल कॉलेजची लॅब कोविड चाचणीसाठी सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लेखी पत्र दिले आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ क्लिनिकल लॅब आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही व खासगी कॉलेजला आमदार निधी देता येत नाही हे मान्य असताना भाजपा आमदारांकडून पडवे मेडिकल कॉलेजमधील कोविड टेस्ट लॅबसाठी निधी देण्याची फसवी घोषणा केली जात आहे.

ठळक मुद्दे शिवसेनेवरील आरोप दिशाभूल करणारे, भाजप आमदारांची घोषणा फसवी : उदय सामंत आमदारांना खासगी कॉलेजला निधी देता येत नाही; शिवसेनेवरील दरेकरांचे आरोप दिशाभूल करणारे

कणकवली : पडवे मेडिकल कॉलेजची लॅब कोविड चाचणीसाठी सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लेखी पत्र दिले आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ क्लिनिकल लॅब आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही व खासगी कॉलेजला आमदार निधी देता येत नाही हे मान्य असताना भाजपा आमदारांकडून पडवे मेडिकल कॉलेजमधील कोविड टेस्ट लॅबसाठी निधी देण्याची फसवी घोषणा केली जात आहे.

प्रत्येकी २० लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा करून कोकणवासीयांची फसवणूक करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. असे सांगतानाच शिवसेना आणि कोकणचे नाते अतूट आहे. त्यामुळे कोणीही कितीही भडकविण्याचा प्रयत्न केला तरी कोकणी जनता त्याला बळी पडणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, सुशांत नाईक, शैलेश भोगले, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, मंगेश लोके, राजू राठोड आदी उपस्थित होते.मंत्री उदय सामंत म्हणाले, भाजपाचे सर्व आमदार रेड झोनमधून आले आहेत. पालकमंत्री म्हणून मी तपासणी नाक्यावर त्यांना अडविले असते. मात्र, ते प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आले असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केले.

जे बोलायचे ते खोटेच बोलायचे आणि सिंधुदुर्गवासीय व चाकरमानी यांच्यात वाद लावून द्यायचे. ही त्यांची भूमिका आहे. मुंबईकरांना आमचा विरोध नाही. गेल्या ३ दिवसांत २७ हजार लोक आले. प्रशासनाकडून रितसर परवाना घेऊन चाकरमान्यांनी यावे, असे आमचे म्हणणे आहे.आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह यावरूनही विरोधकांकडून राजकारण सुरू झाले आहे. तसे विरोधकांनी करू नये. अहवालातील प्रिंटिंग मिस्टेकचा तो परिणाम होता. त्याबाबत संबंधितांनी लगेचच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनावावर चुकीचे आरोप कोणीही करू नयेत.

ज्यावेळी भाजपवाले सत्तेत होते त्यावेळचेच अधिकारी आताही आहेत. पण वेगळ्या चष्म्यातून पाहिल्यामुळे त्यांना आता ते चूक वाटत आहेत. शिवसेना आणि कोकणचे नाते अतूट आहे. त्यामुळे कोणी कितीही भडकविण्याचा प्रयत्न केल्यास कोकणी जनता त्याला बळी पडणार नाही.

शासन व पडवे येथील मेडिकल कॉलेज एकत्र येऊन लॅब करीत असतील तर जिल्हा नियोजनमधून त्यांना निश्चित पैसे देऊ. डेरवणला बरीच वर्षे रुग्णालय सुरू आहे. त्यामुळे तिथे मंजुरी दिली आहे. पडवे कॉलेज आता सुरू होत आहे. पडवे हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ चाचणीसाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. तंत्रज्ञ नाहीत. असा जिल्हा आरोग्य विभागाकडून अहवाल देण्यात आला आहे.जिल्ह्यात माकडताप आल्यानंतर साडेआठ कोटींची लॅब जिल्हा रुग्णालयात होत आहे. तसेच कोविड तपासणीबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वॅब तपासणी मशीन दोन दिवसांत येईल. आता कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातील स्वॅब चाचणी होत आहे. तसेच परराज्यातील परीक्षा पहिल्यादा दोडामार्गमध्ये झाली, हे विरोधकांनी पहावे.वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्र्यांनी चांगले नियोजन केल्याने कोरोना साथ आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या शून्य रुग्णाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. प्रमोद जठारांनी आता जिल्ह्यात रहावे. ते येथे येणार, राजकारण करणार आणि पुन्हा जाणार. हे चालू राहील. त्यामुळे त्यांनी येथेच थांबावे, असा उपरोधिक टोला वैभव नाईक यांनी लगावला.

रिक्षा, बससेवा आजपासून सुरू होणार; भाजपमुळेच काजूचे दर पडले रिक्षा व बससेवा २२ मे पासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. सोशल डिस्टन्स राखून रिक्षा चालू होणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू होणार आहेत, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.जिल्ह्यातील सरपंचांची बैठक घेतली. त्यावेळी मुंबईकर चाकरमान्यांचे सरपंच स्वागत करीत आहेत. फक्त अधिकृत पास घेऊन त्यांनी यावे अशी त्यांची मागणी आहे. आम्हांला चाकरमान्यांची काळजी आहे. त्यामुळेच पास घेऊन या असे आमचे त्यांना सांगणे आहे. कारण त्यामुळे व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.काजूचे दर पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे काम चालू आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची एकवाक्यता असती तर काजू बागायतदारांना चांगला दर मिळाला असता. फक्त टीका करीत राहणे असे धोरण भाजप नेत्यांचे आहे, अशी टीका सतीश सावंत यांनी यावेळी केली.विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना बदनाम करणे सुरू आहे. शुक्रवारी भाजप आंदोलन करुन काय संदेश देणार आहे? त्यांच्या काही सूचना असतील तर त्या कराव्यात. मी स्वत: तयार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जो सल्ला दिला तो भाजपा पाळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा गडकरींचे ऐकत नाही हे या आंदोलनात दिसून येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग