शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अल्बर्ट हॉवर्ड कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST

सेंद्रीय शेती पद्धतीचे जनक

एखाद्या व्यक्तीची एका विशिष्ट कार्यासाठी नियुक्ती व्हावी, त्या व्यक्तीने संबंधित ठिकाणी गेल्यावर मूळ हेतू विसरून तेथील जनतेच्या आणि मातीच्या प्रेमात पडावे आणि त्यांच्यातीलच एक होऊन जावे. असेच काहीसे सर अल्बर्ट हॉवर्ड यांच्याबाबतीत घडले. भारतात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी आधुनिक पाश्चात्य शेती पध्दती भारतातील लोकांना शिकवण्यासाठी अल्बर्ट यांना ब्रिटिश शासनाने भारतात पाठवले. पण, भारतातील शेती पध्दतीच्या प्रेमात पडून ते शेती कशी करायची, हे पाहायचे असेल तर भारतात या, असे सांगू लागले. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सेंद्रीय शेती पध्दतीचा जनक असेही म्हटले जाते.ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात रिचर्ड आणि अ‍ॅन हॉवर्ड या दाम्पत्याच्या पोटी अल्बर्ट यांचा ८ डिसेंबर १८७३ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकीन महाविद्यालयातून झाले. पुढे त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १८८७मध्ये त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यांनी १९०२पर्यंत कृषीशास्त्राचा शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल कॉलेजमध्ये काम केले. नंतर त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५पासून भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये ते वनस्पती शास्त्रातील अर्थविषयक सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड कर्झन यांनी त्याकाळी पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळातून जनतेला वाचवायचे असेल तर कृषी उत्पादन वाढवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले होते. या संशोधकामध्ये अल्बर्ट यांचा समावेश होता. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. मात्र, पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती पध्दतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले.भारतीय शेती पध्दतीतून होणारे अन्नधान्याचे उत्पादन हे अधिक पोषक असल्याचे निरीक्षणांती त्यांच्या लक्षात आले. माती सकस असेल, वनस्पतींना आवश्यक असणारे सर्व अन्न घटक धारण करणारी मृदा असेल आणि अशा मातीत उत्पादित झालेले अन्न आहारात असेल तर मानव आणि पशू आजारी पडणार नाहीत, असे प्रतिपादन अल्बर्ट यांनी केले. हे निरीक्षण शास्त्रीय पातळीवर तपासून त्यांनी माती निरोगी असेल तर मानव आणि पशू निरोगी राहतील, असे सांगितले. वनस्पती उद्योग विभागाचे संचालक म्हणून अल्बर्ट यांनी काम पाहिले. इंदौर आणि राजपुताना संस्थानचे ते कृषी मार्गदर्शक होते. त्यांची रॉयल सोसायटीने फेलो म्हणून नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या प्रथम पत्नी गॅब्रिएला आणि त्यांची बहीण (आणि अल्बर्ट यांची व्दितीय पत्नी) ल्यूसी याही वनस्पतीशास्त्रातील संशोधन करत होत्या. त्यांनीही महत्वपूर्ण कार्य केले. अल्बर्ट यांनी सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच अ‍ॅग्रीकल्चरल टेस्टामेंट हे सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करणारे पुस्तक लिहिले. भारतीय शेती पध्दतीचा पुरस्कार करणारे फॉर्मिंग आॅर गार्डनिंंग फॉर हेल्थ आॅर डिसिज हे पुस्तक १९४०मध्ये प्रकाशित केले. याव्यतिरिक्तही त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली. त्यांना १९३४ मध्ये त्यांना सर या उपाधीने सन्मानित करण्यात आले. मातीचे महत्व ओळखून रासायनिक खताचा प्रसार करायला आलेला हा संशोधक रासायनिक खताचा दुस्वास करू लागला, अर्थात खत कंपन्यांना हे मानवणारे नव्हते. मात्र, २० आॅक्टोबर १९४७ला शेवटचा श्वास घेईपर्यंत हा संशोधक भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहिला.डॉ. व्ही.एन. शिंदे,उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर