शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

चांदा ते बांदा अंतर्गत 67 गटांना कृषि औजारांचा पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:08 PM

चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

ठळक मुद्देचांदा ते बांदा अंतर्गत 67 गटांना कृषि औजारांचा पुरवठा होणारकाजू कलमे लागवड, मिरी लागवड शेतकऱ्यांना परवाना पत्रे

सिंधुदुर्ग: चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

  चांदा ते बांदा योजना व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै. सभागृहात आयोजित शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती मोरजकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रसाद देवधर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूणकुमार झा, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळ, सी.जी. बागल, राजन पोकळे आदी उपस्थित होते.चांदा ते बांदा कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत बँक ऑफ इंडियाकडे 75 टक्के अनुदानाचा हिस्सा जमा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांनी यासाठी कोणतेही तारण देण्याची गरज नाही यांत्रिकीकरणाद्वारे उपलब्ध होणारी औजारे तारण म्हणून राहतील.

ते पुढे म्हणाले, शेतीला पुरक व्यवसायांची जोड मिळाली पाहिजे यासाठी चांदा ते बांदा अंतर्गत एक हजार शेतकऱ्यांना दुधाळ गाई-म्हैशींचा पुरवठा तर पाच हजार कुटुंबाना कोंबड्या पुरविण्यात येणार आहेत. या योजनांचांही शेतकरी व महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी प्रमुख वक्ते फोंडा कृषी संशोधन केंद्राचे डॉ. विजयकुमार शेट्ये यांनी भात पिकांची लागवड व उत्पादन क्षमता वाढविणे याबाबत सविस्तर माहिती दिली. भात पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी भात शेतीतील लावणी पासून तोडणी पर्यंतची सर्व कामे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने करण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उपविभागीय अधिकारी डॉ.सी.जी.बागल यांनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. श्री भात लागवड पध्दत, दुबार पिक, फळझाड लागवड, आंबा पुनरूज्जीवन आदी योजनांची माहिती दिली.यावेळी चांदा ते बांदा योजनेतील काजू कलमे लागवड, मिरी लागवड शेतकऱ्यांना परवाना पत्रे देण्यात आली. या मेळाव्यात आमदार वैभव नाईक, डॉ. प्रसाद देवधर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांचीही समयोचित भाषणे झाली.प्रारंभी प्रास्ताविकात प्रभारी अधिक्षक कृषि अधिकारी एस.एन.म्हेत्रे यांनी सिंधुदुर्ग भात उत्पादनात आघाडीवर आहे असे सांगून ही भात उत्पादन क्षमता यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने वाढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

गतवर्षी श्री पध्दतीने एक हजार हेक्टर क्षेत्रावर हेक्टरी 6 हजार 500 रूपये अनुदान देऊन भात लागवड केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड नियोजित असल्याची माहिती त्यांनी दिली.या शेतकरी मेळाव्यास जिल्ह्यातून शेतकरी, शेतकरी कंपनीचे सदस्य, बचत गटांचे प्रतिनिधी, विविध कार्यकारी सेवा संस्था, ग्रामपंचायतीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग