शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कोकण किनारपट्टीला 'क्यार'नंतर 'महा' चक्रीवादळाचा तडाखा, पर्यटनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 15:15 IST

क्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे.

ठळक मुद्देक्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. खराब वातावरणामुळे प्रवासी वाहतूक बंद केल्याने जेटीवर किल्ला दर्शनासाठी शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अरबी समुद्रातंर्गत बदलांचा मोठा फटका यावर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे.

मालवण : क्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सकाळपासून समुद्री वातावरणात बदल झाला असून समुद्री लाटांचा जोर वाढला आहे. याचा फटका किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस बसला आहे. खराब वातावरणामुळे प्रवासी वाहतूक बंद केल्याने जेटीवर किल्ला दर्शनासाठी शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 

अरबी समुद्रातंर्गत बदलांचा मोठा फटका यावर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रीय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेग वाढला असून किनार्‍यावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. दिवाळी सुटीच्या काळात काही प्रमाणात येथे पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र खराब वातावरणाचा फटका पर्यटनास बसला असून आज किल्ला दर्शनासाठी जेटीवर दाखल झालेल्या शेकडो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन घ्यावे लागत आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मालवणात पर्यटकांचा ओघ असून गुरुवारी दोन हजार पर्यटकांनी किल्ले दर्शन केले. गुरुवारी वातावरण निवळल्याने होडी सेवा सुरळीत ठेवण्यात आली होती.

 ‘क्यार’ वादळाचा याआधी काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आल्याने किनारपट्टीलगतच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. तसेच पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस  पडला. किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका आचरा पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला. खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दूषित झालंय, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. 

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे. सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 10 टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

टॅग्स :konkanकोकणMalvan beachमालवण समुद्र किनाराKyarr Cyclonक्यार चक्रीवादळtourismपर्यटन