शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीचा पुढाकार हवा

By admin | Updated: October 2, 2014 22:25 IST

संसार उद्ध्वस्त : ग्रामीण भागात अजूनही हातभट्ट्यांची धगधग

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी-दारूच्या व्यसनामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण भागात हातभट्ट्या धगधगत आहेत. हातभट्ट्यांची संख्या अल्प असली तरी गावोगावी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. गावोगावी नियुक्त करण्यात आलेल्या तंटामुक्त समित्यांनी याकामी पुढाकार घेतला तर संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी होऊ शकते.रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानाला प्रारंभ झाला. दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर प्रकारचे तंटे सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. तंटे सोडवून गावात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच ग्राम सुरक्षा, दारूबंदी यांसारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे. जेणेकरून गावात खऱ्या अर्थाने शांतता निर्माण होईल, संसार सुखाने नांदतील. तंटामुक्त समित्या व ग्रामस्थांचा सुरूवातीला उत्साह अधिक होता. पहिल्या तीन वर्षांत समित्यांच्या बैठका नियमित होऊन तंटे सोडवण्यावर विशेष भर देण्यात येत होता. एकूणच तंटामुक्त गावासाठी असलेल्या लाखो रूपयांच्या पारितोषिकांमुळे ग्रामस्थ, समित्यांमध्ये उत्साह दांडगा होता.तडजोडीने मिटणारे सर्व तंटे गावातच मिटावे, असे योजनेचे उद्दिष्ट असल्याने समित्या त्यासाठी प्रयत्नशील होत्या. जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. अद्याप ३१० गावे तंटामुक्त झालेली नाहीत. दरवर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे. परंतु तंटामुक्त समित्यांनी तंटे मिटविण्याबरोबर गावात शंभर टक्के दारूबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दारुच्या व्यसनाने अंकुश वेलोंदे याने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केले. दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याने आता तिन्ही मुलांचे जीवन अंधारमय झालं आहे. आजीही वृध्द झाल्याने तिचा आधार कुठपर्यंत मिळणार आहे. व्यसनाधीन झालेल्या अंकुशला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला होता. अखेर त्याने व्यसनाच्या भरात स्वत:सह पत्नीचाही घात करुन मुलांना वाऱ्यावर सोडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने ओरी गाव हादरला. त्याचबरोबर रूग्णालयात उपचारासाठी दाखल पतीनेच डबा घेऊन आलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटना निकटच्या असल्या तरी अशा प्रकारच्या अनेक घटना वर्षभरात घडत असतात. त्यामुळे त्यासाठी तंटामुक्त समित्यानी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने व्यसनमुक्तीसाठी दारूबंदी करण्याची गरज आहे.मिरजोळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठोबा पाटील सलग चार वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. गावात त्यांनी दोन वर्षांपूर्वी (२०१२-१३) मध्ये संपूर्ण दारूबंदी केली होती. गावात घरोघरी फिरून दारूबंदीचे आवाहन करण्यात आले होते. तसा प्रयत्न सर्वत्र करणे गरजेचे असल्याचे मत विठोबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.