शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

आडेली तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: April 6, 2016 23:43 IST

निधीचा अभाव : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गळतीमुळे पाणी जातेय वाया; जीर्ण नळांना झाडांच्या मुळांचा धोका रामचंद्र कुडाळकर -- तळवडे

आडेलीतील लघुपाटबंधारे विभागामार्फत उभारण्यात आलेल्या तलावाची दुरवस्था झाली असून, तलावाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावाच्या धरणाचे दरवाजे, पाणीपुरवठा नळ जीर्ण झाले असून, यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तलाव दुरुस्तीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पाणी उपलब्ध असून केवळ नियोजनाअभावी तलावातच साचून आहे. एकीकडे दुष्काळाची झळ बसत असताना आडेली तलावात पाणी असूनही त्याचे नियोजनबद्ध वाटप होत नसल्याने प्रशासनाच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेंगुर्ले तालुक्याला पाणी टंचाईची समस्या दरवर्षीचीच असते. या टंचाईवर मात करण्यासाठी आडेली येथे पाणीसाठा करणाऱ्या तलावाची उणीव भासत होती. याठिकाणी एखादा तलाव निर्माण झाला तर तलावात पावसाचे पाणी साठून राहीलच; शिवाय अडविलेले पाणी जमिनीत जिरूही शकेल. नेमकी हीच गरज ओळखून आडेलीतील शेतकऱ्यांची पाण्याची सोय करण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने आडेली परिसरात पाहणी करून येथे तलाव उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. १९७३ साली या धरणासाठी प्रथम प्रशासकीय रक्कम ९ लाख ५८ हजार रुपये मंजूर झाले होते; पण नंतर सुधारित रक्कम १२ लाख ७५ हजार रुपये मंजूर झाले आणि त्यातून तलाव दृष्टिपथात येऊ लागला. १९७७ साली तलावाची प्रत्यक्षात उभारणी करण्यात आली. या तलावात ०.५३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण करण्यात आली. शिवाय या प्रकल्पाची सिंचन क्षमताही १३४.०० हेक्टरची आहे. हा तलाव केवळ शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येऊन या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती प्रेरणा मिळावी, हा हेतू ठेवण्यात आला होता. त्याची सुरुवातही चांगली झाली; पण १५ वर्षानंतर या तलावाचे मजबुतीकरण करणे गरजेचे बनले. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. हे काम १९९५ साली पूर्ण झाले. तलावामध्ये पाणीसाठा होत राहिला; पण सिमित क्षेत्रातच पाणी पुरवठा सुरू राहिला; पण या तलावाच्या दुरुस्तीकडचे दुर्लक्ष मात्र कायम राहिले. या तलावाच्या धरणाचे लोखंडी गेट, पाईपलाईन, दरवाजे यांची दरुस्ती करणे सध्या गरजेचे आहे. तलावाच्या ठिकाणी भूअंतर्गत पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनमधील जॉर्इंटना गळती असल्यामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे. तर भविष्यात या गळतीच्या ठिकाणातून झाडाची मुळे पाईपलाईनमध्ये शिरून नळ चॉकअप होण्याची शक्यता आहे. तरीही संबंधित विभागाने तलाव दुरुस्तीत कधीच गांभीर्य दाखविले नाही. जर असेच दुर्लक्ष राहिले, तर भविष्यात हा तलाव ‘पाणी उशासी तहान घशासी’ अशा अवस्थेत येऊन केवळ तलाव शोभेपुरताच मर्यादीत राहील. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी हव्या त्या प्रमाणात मिळू शकते. सध्या या तलावाच्या धरणाची दुरवस्था झाली आहे. यासाठी पाच लाखांच्या आसपास निधी लागेल; पण विभागाकडे तो नसल्याने कोंडी झाली आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आगामी काळात लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून हा निधी मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. स्रेहल माईणकरसहायक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग. सिंचन क्षमता १३४ :- प्रत्यक्षात १५ हेक्टरचया धरणाची लांबी, रुंदी पाहता या धरणात मुबलक पाणीसाठा होऊन वर्षभर पाण्याची सोय होऊ शकतो. या प्रकल्पाची सिंचन क्षमता १३४.०० हेक्टर आहे; पण प्रत्यक्षात मात्र १५ ते २० हेक्टरच्या दरम्यानचे क्षेत्र सिंचनाखाली येते. या धरणाच्या पाण्याखाली गतवर्षी १६.८५ हेक्टर सिंचनाखाली तर २०१५-१६ हे क्षेत्र १५ हेक्टरपर्यंत प्रस्तावित ठेवले होते. ग्रामस्थांचे आंदोलन बेदखल या धरणाची डागडुजी व्हावी, याकरिता तळवडे जिल्हा परिषदेंच्या सदस्या निकिता परब, आडेलीचे सरपंच भरत धर्णे, आपा धुरी, शिवराम धुरी, गंगाधर गोवेकर, बाळा जाधव यांच्यासह आडेलीतील असंख्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या धरणाच्या डागडुजीसाठी उठाव केला; पण त्यांच्या मागणीला प्रशासनाने बेदखल केले आहे.