शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

आडेली तलाव दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: April 6, 2016 23:43 IST

निधीचा अभाव : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गळतीमुळे पाणी जातेय वाया; जीर्ण नळांना झाडांच्या मुळांचा धोका रामचंद्र कुडाळकर -- तळवडे

आडेलीतील लघुपाटबंधारे विभागामार्फत उभारण्यात आलेल्या तलावाची दुरवस्था झाली असून, तलावाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावाच्या धरणाचे दरवाजे, पाणीपुरवठा नळ जीर्ण झाले असून, यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तलाव दुरुस्तीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पाणी उपलब्ध असून केवळ नियोजनाअभावी तलावातच साचून आहे. एकीकडे दुष्काळाची झळ बसत असताना आडेली तलावात पाणी असूनही त्याचे नियोजनबद्ध वाटप होत नसल्याने प्रशासनाच्या या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेंगुर्ले तालुक्याला पाणी टंचाईची समस्या दरवर्षीचीच असते. या टंचाईवर मात करण्यासाठी आडेली येथे पाणीसाठा करणाऱ्या तलावाची उणीव भासत होती. याठिकाणी एखादा तलाव निर्माण झाला तर तलावात पावसाचे पाणी साठून राहीलच; शिवाय अडविलेले पाणी जमिनीत जिरूही शकेल. नेमकी हीच गरज ओळखून आडेलीतील शेतकऱ्यांची पाण्याची सोय करण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने आडेली परिसरात पाहणी करून येथे तलाव उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. १९७३ साली या धरणासाठी प्रथम प्रशासकीय रक्कम ९ लाख ५८ हजार रुपये मंजूर झाले होते; पण नंतर सुधारित रक्कम १२ लाख ७५ हजार रुपये मंजूर झाले आणि त्यातून तलाव दृष्टिपथात येऊ लागला. १९७७ साली तलावाची प्रत्यक्षात उभारणी करण्यात आली. या तलावात ०.५३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण करण्यात आली. शिवाय या प्रकल्पाची सिंचन क्षमताही १३४.०० हेक्टरची आहे. हा तलाव केवळ शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येऊन या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती प्रेरणा मिळावी, हा हेतू ठेवण्यात आला होता. त्याची सुरुवातही चांगली झाली; पण १५ वर्षानंतर या तलावाचे मजबुतीकरण करणे गरजेचे बनले. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. हे काम १९९५ साली पूर्ण झाले. तलावामध्ये पाणीसाठा होत राहिला; पण सिमित क्षेत्रातच पाणी पुरवठा सुरू राहिला; पण या तलावाच्या दुरुस्तीकडचे दुर्लक्ष मात्र कायम राहिले. या तलावाच्या धरणाचे लोखंडी गेट, पाईपलाईन, दरवाजे यांची दरुस्ती करणे सध्या गरजेचे आहे. तलावाच्या ठिकाणी भूअंतर्गत पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनमधील जॉर्इंटना गळती असल्यामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे. तर भविष्यात या गळतीच्या ठिकाणातून झाडाची मुळे पाईपलाईनमध्ये शिरून नळ चॉकअप होण्याची शक्यता आहे. तरीही संबंधित विभागाने तलाव दुरुस्तीत कधीच गांभीर्य दाखविले नाही. जर असेच दुर्लक्ष राहिले, तर भविष्यात हा तलाव ‘पाणी उशासी तहान घशासी’ अशा अवस्थेत येऊन केवळ तलाव शोभेपुरताच मर्यादीत राहील. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी हव्या त्या प्रमाणात मिळू शकते. सध्या या तलावाच्या धरणाची दुरवस्था झाली आहे. यासाठी पाच लाखांच्या आसपास निधी लागेल; पण विभागाकडे तो नसल्याने कोंडी झाली आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आगामी काळात लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून हा निधी मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. स्रेहल माईणकरसहायक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग. सिंचन क्षमता १३४ :- प्रत्यक्षात १५ हेक्टरचया धरणाची लांबी, रुंदी पाहता या धरणात मुबलक पाणीसाठा होऊन वर्षभर पाण्याची सोय होऊ शकतो. या प्रकल्पाची सिंचन क्षमता १३४.०० हेक्टर आहे; पण प्रत्यक्षात मात्र १५ ते २० हेक्टरच्या दरम्यानचे क्षेत्र सिंचनाखाली येते. या धरणाच्या पाण्याखाली गतवर्षी १६.८५ हेक्टर सिंचनाखाली तर २०१५-१६ हे क्षेत्र १५ हेक्टरपर्यंत प्रस्तावित ठेवले होते. ग्रामस्थांचे आंदोलन बेदखल या धरणाची डागडुजी व्हावी, याकरिता तळवडे जिल्हा परिषदेंच्या सदस्या निकिता परब, आडेलीचे सरपंच भरत धर्णे, आपा धुरी, शिवराम धुरी, गंगाधर गोवेकर, बाळा जाधव यांच्यासह आडेलीतील असंख्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या धरणाच्या डागडुजीसाठी उठाव केला; पण त्यांच्या मागणीला प्रशासनाने बेदखल केले आहे.