शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Sindhudurg: जानवली येथील अपघाताचा सखोल तपास करावा, ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:36 IST

..अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय-लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. त्या दोघांना धडक देणाऱ्या वाहन चालकावर ३०४ कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे व जानवली, बौद्धवाडी येथील ग्रामस्थानी केली आहे. कणकवली पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवारी २५ एप्रिलला कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. या अपघात प्रकरणाबाबत २२ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे  कांबळे यांनी  यावेळी सांगितले.जाधव माय-लेकाच्या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जानवली सरपंच अजित पवार, भाई जाधव, मंगेश पवार, बाळा डांगमोडेकर, नागेश पवार, दिपा पवार, सुनिता पवार, प्रतिभा जाधव, सुनिता डागमोडेकर, डॉ. राहुल पवार, प्रियांका पवार, क्रांती पवार, मेघा पवार, श्रद्धा तळवडेकर, प्रज्ञा तळवडेकर यांच्यासह जाधव यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शरद देठे  उपस्थित होते.मंगला जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारसह पसार झालेल्या चालकास फोंडाघाट तपासणी नाका येथे कार्यरत पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी मनोज पाटील व शरद देठे यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. कांबळे म्हणाले, मंगला जाधव या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा खर्च करताना जाधव कुटुंबियांची दमछाक होत आहे.अपघातानंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. चालकाला अभय मिळेल, अशी कलमे गुन्हा दाखल करताना लावण्यात आली आहेत. अपघातापासून आजपर्यंत शरदचंद्र जाधव याच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला नाही.  कार चालक तोच होता का?, अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज का घेण्यात आले नाही, असे सवाल अ‍ॅड. कांबळे व जाधव यांच्या कुटुंबियांनी पोलिस अधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात