शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

सावधान.. सह्याद्रीचा बुरुज ढासळतोय; नाटळ येथील डोंगर पुन्हा कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:32 IST

गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगराचा काही भाग गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी अचानक कोसळला आहे. यामुळे येथील नजीकच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले. या घटनेमुळे चार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळण्याच्या घटनेचे स्मरण झाले आहे.नाटळ गावाला तीनही बाजूंनी डोंगर रांगांनी संरक्षण मिळाले आहे, पण जेव्हा हे संरक्षण संकटासारखे रूप धारण करते, तेव्हा ग्रामस्थांची चिंता वाढते. गावाच्या पूर्वेस मोठा डोंगर पसरला असून, गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते. या घाटमाथ्याजवळून कोल्हापूरमधील काळम्मा धरणाचे पाणी येथील डोंगर भागात मुरत आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यातही येथे पाण्याचे अस्तित्व राहिल्याने, डोंगरांच्या माती भाजणीचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस पाणी साचण्याची क्षमता वाढत असल्यामुळे या भागात भूस्खलनाचा धोका अधिक आहे. यावर शासनस्तरावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या वर्षी पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. १२ मे पासून दमदार पाऊस होत असून, डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याच्या परिणामस्वरूप, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्या डोंगराचा एक भाग कोसळला. जो फळसाच्या माळला लागून आहे. रात्रीच्या वेळी डोंगराचा भाग कोसळल्यामुळे कानठळी बसणारा आवाज झाला, असे रात्री जागे असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.शासनाकडून उपाययोजना आवश्यकडोंगराचा कोसळलेला भाग खाली राहत असलेल्या नामदेव सावंत व त्यांच्या भावांच्या घरांपासून खूप जवळ आहे. कोसळलेली माती आणि दगड थेट नदीपात्रात पडले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अंदाजे २५-३० मीटर रुंद आणि २५०-३०० मीटर उंचीचा भाग डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपासून या भागात अनेक छोटे छोटे भूस्खलन होत आहेत. निसर्गाने येथे त्याचा रौद्र रूप दाखवला असून, भविष्यात अशा नैसर्गिक संकटांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी शासनात उपाययोजना आवश्यक आहेत.

शासनाचे सर्वेक्षण अहवाल प्राप्त नाहीतचार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळल्याने एक घर जमिनीखाली गाडले गेले व एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी झाला होता. या घटनेनंतर शासनाने सह्याद्री पट्ट्यातील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांमधील डोंगर भागांचे सर्वेक्षण केले होते. ग्रामस्थांना त्यांच्या घरांचा विमा त्वरित काढण्याबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या, मात्र त्यात जीविताच्या सुरक्षेचा उल्लेख नव्हता. शासनाचे सर्वेक्षण अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही, अशी चौकशीत माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या बाबतीत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

काळम्मा धरणाचे पाणी येथे अनेक वर्षांपासून मुरत असल्याने माती सैल झाली असून, डोंगर कोसळण्याचा धोका वाढला आहे. आम्ही जंगल भागांत फेरफटका मारला असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाची चिन्हे दिसून आली आहेत. ही परिस्थिती भविष्यात अतिशय धोकादायक ठरू शकते. - गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी