शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान.. सह्याद्रीचा बुरुज ढासळतोय; नाटळ येथील डोंगर पुन्हा कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:32 IST

गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगराचा काही भाग गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी अचानक कोसळला आहे. यामुळे येथील नजीकच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले. या घटनेमुळे चार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळण्याच्या घटनेचे स्मरण झाले आहे.नाटळ गावाला तीनही बाजूंनी डोंगर रांगांनी संरक्षण मिळाले आहे, पण जेव्हा हे संरक्षण संकटासारखे रूप धारण करते, तेव्हा ग्रामस्थांची चिंता वाढते. गावाच्या पूर्वेस मोठा डोंगर पसरला असून, गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते. या घाटमाथ्याजवळून कोल्हापूरमधील काळम्मा धरणाचे पाणी येथील डोंगर भागात मुरत आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यातही येथे पाण्याचे अस्तित्व राहिल्याने, डोंगरांच्या माती भाजणीचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस पाणी साचण्याची क्षमता वाढत असल्यामुळे या भागात भूस्खलनाचा धोका अधिक आहे. यावर शासनस्तरावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या वर्षी पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. १२ मे पासून दमदार पाऊस होत असून, डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याच्या परिणामस्वरूप, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्या डोंगराचा एक भाग कोसळला. जो फळसाच्या माळला लागून आहे. रात्रीच्या वेळी डोंगराचा भाग कोसळल्यामुळे कानठळी बसणारा आवाज झाला, असे रात्री जागे असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.शासनाकडून उपाययोजना आवश्यकडोंगराचा कोसळलेला भाग खाली राहत असलेल्या नामदेव सावंत व त्यांच्या भावांच्या घरांपासून खूप जवळ आहे. कोसळलेली माती आणि दगड थेट नदीपात्रात पडले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अंदाजे २५-३० मीटर रुंद आणि २५०-३०० मीटर उंचीचा भाग डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपासून या भागात अनेक छोटे छोटे भूस्खलन होत आहेत. निसर्गाने येथे त्याचा रौद्र रूप दाखवला असून, भविष्यात अशा नैसर्गिक संकटांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी शासनात उपाययोजना आवश्यक आहेत.

शासनाचे सर्वेक्षण अहवाल प्राप्त नाहीतचार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळल्याने एक घर जमिनीखाली गाडले गेले व एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी झाला होता. या घटनेनंतर शासनाने सह्याद्री पट्ट्यातील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांमधील डोंगर भागांचे सर्वेक्षण केले होते. ग्रामस्थांना त्यांच्या घरांचा विमा त्वरित काढण्याबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या, मात्र त्यात जीविताच्या सुरक्षेचा उल्लेख नव्हता. शासनाचे सर्वेक्षण अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही, अशी चौकशीत माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या बाबतीत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

काळम्मा धरणाचे पाणी येथे अनेक वर्षांपासून मुरत असल्याने माती सैल झाली असून, डोंगर कोसळण्याचा धोका वाढला आहे. आम्ही जंगल भागांत फेरफटका मारला असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाची चिन्हे दिसून आली आहेत. ही परिस्थिती भविष्यात अतिशय धोकादायक ठरू शकते. - गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी