शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:29 AM

डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देडिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक शेतकऱ्यांवर मोठे संकट

बांदा : डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.या आगीत विजय गोपाळ सावंत, लवू रामचंद्र सावंत, सोंडो भिवा सावंत, लक्ष्मण सुरेश सावंत, रामा शंभू सावंत या शेतकऱ्यांची सुमारे २५० काजू कलमे जळून खाक झाली.शनिवारी दुपारी आपल्या बागायतीमधील काम आटोपून बहुतांशी शेतकरी जेवणासाठी गेले होते. बागायतीमधून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.

स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बंबाद्वारे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्यात आली.यावेळी ग्रामसेवक एल. एस. परब, कृषी सहाय्यक रुपाली पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप धुरी, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डिंगणे सरपंच जयेश सावंत, दिनेश सावंत, शंकर सावंत, फटू सावंत, संतोष नाईक, तनय नाईक, राजू सावंत, शिवराम सावंत, यशवंत सावंत, ऋषिकेश सावंत, रवींद्र सावंत, महादेव सावंत, मनोज सावंत, तुषार सावंत, सुहासिनी सावंत, प्रगती सावंत, शुभम सावंत, विश्वास सावंत यांनी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग