शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उशिरा आलेल्या मोहोरामुळे २५ टक्के आंबा झाडांवरच!

By admin | Published: May 19, 2017 12:39 AM

उशिरा आलेल्या मोहोरामुळे२५ टक्के आंबा झाडांवरच!

मेहरून नाकाडे। लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शेवटच्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे तयार झाला असून, झाडावरच पिकू लागला आहे. अवकाळी पावसाचा फटका या आंब्याला बसला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात येथून आंबापेट्या विक्रीला येत आहेत. महाराष्ट्रातून दररोज एक लाख, तर कर्नाटकमधून २५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये सहा राज्यातून हापूस विक्रीला येत आहे. आवक वाढल्यामुळे दर कोसळले असून, शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वीचा दर आता मिळत आहे.कोकणातून आलेल्या हापूसची विक्री १०० ते २०० रूपये डझन दराने वाशी मार्केटमध्ये सुरू आहे. कर्नाटक हापूस ३० ते ३५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. विक्रेते किलोवर मिळणारा कर्नाटक, गुजरातसह अन्य राज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस सांगून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा अधिकतम पाऊस होऊनही आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. जमिनीत ओलावा असताना मोहोर आला. परंतु पुनर्मोहोरामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातून हापूस बाजारात जाऊ लागला. सुरूवातीला पेटीला २००० ते १०,००० रूपयांपर्यंत दर देण्यात आला. मात्र, नंतर तो हळूहळू खाली आला. कोकणातील हापूसबरोबरच कर्नाटकचा हापूस सुरू झाला. महाराष्ट्राबरोबर केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात आदी सहा राज्यातून हापूस मुंबईत आला. रत्नागिरी हापूसला त्याचा चांगलाच फटका बसला. दिसायला बऱ्यापैकी सारखा असलेला परराज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस म्हणून विकण्यास सुरूवात झाली. त्याचा मोठा फटका कोकणातील शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.एका बाजूला बाजारपेठेत हापूसला अनेक समस्या असताना दुसऱ्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात आंबा झाडावरच आहे. थंडी उशिरापर्यंत पडली असल्यामुळे झाडांना पालवी येत राहिली. त्यामुळे उशिरापर्यंत मोहोर येत राहिला. उशिरा आलेला हा मोहोर अजूनही झाडावर आहे. जवळजवळ २५ टक्के पीक अजूनही झाडावर आहे. आता पाऊस पडत असल्यामुळे यातील कितीसे पीक हातात येईल याबाबत बागायतदारही साशंक आहेत. यातील बहुतांश आंबा कॅनिंगलाच टाकला जाण्याची शक्यता आहे.