शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्गात १५२ जोखीमग्रस्त गावे निश्चित, योगेश साळे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:57 IST

येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात १५२ जोखीमग्रस्त गावे निश्चित, योगेश साळे यांची माहिती ७७ लेप्टोबाधित तर ५३ पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाचा राहणार वॉच

सिंधुदुर्गनगरी : येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात मिळून एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. यात ७७ लेप्टो स्पायरोसिस बाधित गावांचा समावेश आहे.

या सर्व गावांमध्ये प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. या गावांसह जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष १ जूनपासून सुरू करण्यात येणार असून हे कक्ष सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.पाऊस आला की लेप्टो स्पायरोसिस, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू तसेच साथीचे विविध आजार उद्भवतात. हे आजार उद्भवू नयेत, तसेच हे आजार उद्भवले तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्वतोपरी दक्षता घेतली जाते.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागामार्फत साथरोग जोखीमग्रस्त गावांची निश्चिती केली जाते आणि पाऊस पडण्या अगोदरपासूनच सर्व उपाययोजना केल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८-१९ या कालावधीसाठी एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली असून जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना साथरोग नियंत्रण संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तालुका आणि जिल्हास्तरावरही हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा साथरोग नियंत्रणासाठी सज्ज झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. या पावसाळ्यात साथरोगाचा कोणताही प्रादुर्भाव जाणवू नये आणि तो जाणवला तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी अशी रचनाही करण्यात आली असल्याचे डॉ. साळे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल