शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सिंधुदुर्गात १५२ जोखीमग्रस्त गावे निश्चित, योगेश साळे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:57 IST

येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात १५२ जोखीमग्रस्त गावे निश्चित, योगेश साळे यांची माहिती ७७ लेप्टोबाधित तर ५३ पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाचा राहणार वॉच

सिंधुदुर्गनगरी : येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जोखीमग्रस्त गाव निश्चित करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात मिळून एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. यात ७७ लेप्टो स्पायरोसिस बाधित गावांचा समावेश आहे.

या सर्व गावांमध्ये प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. या गावांसह जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष १ जूनपासून सुरू करण्यात येणार असून हे कक्ष सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.पाऊस आला की लेप्टो स्पायरोसिस, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू तसेच साथीचे विविध आजार उद्भवतात. हे आजार उद्भवू नयेत, तसेच हे आजार उद्भवले तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्वतोपरी दक्षता घेतली जाते.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागामार्फत साथरोग जोखीमग्रस्त गावांची निश्चिती केली जाते आणि पाऊस पडण्या अगोदरपासूनच सर्व उपाययोजना केल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८-१९ या कालावधीसाठी एकूण १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली असून जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना साथरोग नियंत्रण संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तालुका आणि जिल्हास्तरावरही हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा साथरोग नियंत्रणासाठी सज्ज झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. या पावसाळ्यात साथरोगाचा कोणताही प्रादुर्भाव जाणवू नये आणि तो जाणवला तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी अशी रचनाही करण्यात आली असल्याचे डॉ. साळे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल