शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:32 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमासावंतवाडी तालुका : आंबा, काजू पिकांचा समावेश

अनंत जाधव सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात आली आहे. तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांची आंबा पिकाची सुमारे ८९७.१४ हेक्टरची ६ कोटी ७८ लाख ७२ हजार ६६६ रुपयांची तर काजू पिकाची ४१६ शेतकऱ्यांची ३२६.९६ हेक्टर क्षेत्राची ९ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे.तालुक्यात गेल्यावर्षी अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, हवामानात बदल, वादळी वारे यामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील बागायतदार तसेच आंबा, काजू लागवड करणारे शेतकरी यांचा खासगी विमा कंपनीकडून हवामानावर आधारित पीक विमा भरपाई योजनेनुसार पीक विमा काढला होता. अवेळी पाऊस, वादळी वारे यामुळे तालुक्यातील कलंबिस्त भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आंबा, काजू फळपिकांची नासधूस झाली होती.हवामानावर आधारित आंबा पिकाची नुकसानी देताना १ जानेवारी ते ३१ मेपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. काजू पिकाची १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. मागील वर्षातील फळपीक विमा योजनेची सर्व नुकसानीची रक्कम यावर्षी प्राप्त झाली आहे.रक्कम थेट खात्यात जमा होणारआंबा व काजू फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे हवामानावर आधारित पीक विमा भरपाईमध्ये करून भरपाईचे प्रस्ताव विमा कंपनी तसेच शासनाला पाठविले होते. जवळपास वर्षानंतर सप्टेंबरमध्ये पीक विमा भरपाई जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आॅनलाईन बँकिंग पद्धतीने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.३२६.९६ हेक्टर काजू पीक नुकसानयेथील कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यामुळे तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांच्या साधारणपणे ८९७.१४ हेक्टर क्षेत्राचे आंबा पिकाचे नुकसान झाले होते. तर ४१६ शेतकऱ्यांचे काजू पिकाचे ३२६.९६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या चालूवर्षीची आंबा व काजू फळपीक नुकसान भरपाई, पीक विमा योजनेबाबत पंचनामे तसेच प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग