शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
3
'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?
4
अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
5
प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर 
6
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
7
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
8
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
9
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
10
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
11
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
12
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
13
मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 
14
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
15
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
16
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
17
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
18
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
19
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
20
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:32 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमासावंतवाडी तालुका : आंबा, काजू पिकांचा समावेश

अनंत जाधव सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात आली आहे. तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांची आंबा पिकाची सुमारे ८९७.१४ हेक्टरची ६ कोटी ७८ लाख ७२ हजार ६६६ रुपयांची तर काजू पिकाची ४१६ शेतकऱ्यांची ३२६.९६ हेक्टर क्षेत्राची ९ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे.तालुक्यात गेल्यावर्षी अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, हवामानात बदल, वादळी वारे यामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील बागायतदार तसेच आंबा, काजू लागवड करणारे शेतकरी यांचा खासगी विमा कंपनीकडून हवामानावर आधारित पीक विमा भरपाई योजनेनुसार पीक विमा काढला होता. अवेळी पाऊस, वादळी वारे यामुळे तालुक्यातील कलंबिस्त भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आंबा, काजू फळपिकांची नासधूस झाली होती.हवामानावर आधारित आंबा पिकाची नुकसानी देताना १ जानेवारी ते ३१ मेपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. काजू पिकाची १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. मागील वर्षातील फळपीक विमा योजनेची सर्व नुकसानीची रक्कम यावर्षी प्राप्त झाली आहे.रक्कम थेट खात्यात जमा होणारआंबा व काजू फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे हवामानावर आधारित पीक विमा भरपाईमध्ये करून भरपाईचे प्रस्ताव विमा कंपनी तसेच शासनाला पाठविले होते. जवळपास वर्षानंतर सप्टेंबरमध्ये पीक विमा भरपाई जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आॅनलाईन बँकिंग पद्धतीने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.३२६.९६ हेक्टर काजू पीक नुकसानयेथील कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यामुळे तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांच्या साधारणपणे ८९७.१४ हेक्टर क्षेत्राचे आंबा पिकाचे नुकसान झाले होते. तर ४१६ शेतकऱ्यांचे काजू पिकाचे ३२६.९६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या चालूवर्षीची आंबा व काजू फळपीक नुकसान भरपाई, पीक विमा योजनेबाबत पंचनामे तसेच प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग