शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 08:53 IST

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १२९ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र काहींची प्रकृती थोडी गंभीर असल्याने त्यांना सावंतवाडी व कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी झाल्यानंतर उघडकीस आला असून सध्या मुलांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात ४०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्वच विद्यार्थी निवासी असून त्यांना विद्यालयातील मेस मधून जेवण दिले जाते. तसे या विद्यार्थ्यांनी गुरूवारी रात्रीच्या सुमारास जेवण देण्यात आले होते.

सर्वच मुले निवासी, पालकांनी दिली माहितीसर्वच मुले  निवासी असल्याने त्याचे आई-वडील गावी असतात. त्यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच विद्यालयाचे शिक्षक ही विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांत पाचवीपासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय पथक दाखलदरम्यान या घटनेची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक हे सांगेली येथील आरोग्य केंद्रात पाठवले. यात  यात जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सई धुरी, वर्षा शिरोडकर, गौरी तानवडे,  डॉ. मिलिंद खानोलकर यांचा समावेश आहे.ते विद्यार्थ्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

जेवणातील पदार्थ बदलला विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणात नेहमीची बटाट्याची भाजी नव्हती. वेगळी मसाला बटाटा भाजी होती. तसेच जिरा भात होता असे विद्यार्थी सांगत होते. किचनमध्ये ही ठेवण्यात आलेल्या भाज्या या खराब झाल्या होत्या. चपाती ही योग्य नव्हती असा आरोप पालकांनी केला आहे.

सध्यातरी जेवणातून घडला प्रकार - घटनेनंतर सांगेली येथील आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार जेवणातून घडल्याचे मान्य केले. तसेच हा प्रकार जेवणातून विषबाधा आहे. असे ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र जेवण तपासणीनंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे.

- घटनेनंतर विद्यार्थ्याचे पालक शाळेत दाखल झाले  असून सायंकाळी उशिरा पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगेली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस ही केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल