वाईचा सायकलपटू निघाला विक्रमासाठी!

By Admin | Updated: August 13, 2014 23:33 IST2014-08-13T22:37:23+5:302014-08-13T23:33:30+5:30

प्रसाद एरंडे : सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

Yacht cyclist left for a record! | वाईचा सायकलपटू निघाला विक्रमासाठी!

वाईचा सायकलपटू निघाला विक्रमासाठी!

भुर्इंज : जागतिक सायकल स्पर्धेसाठी निवड झालेला आणि एकाच देशात सर्वात जास्त सायकल प्रवासाची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याच्या अंतिम टप्प्यात असलेला वाई येथील प्रसाद नानासाहेब एरंडे पोहोचला आहे.
या स्पर्धेसाठी जगातील सहा सायकलपट्टंू सवेत निवड झालेला प्रसाद एरंडे हा महाराष्ट्र-भारतातील एकमेव स्पर्धक आहे. प्रसादची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती पाहता ‘किसनवीर’ कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. कार्बन ङ्खफायबरच्या महागडी सायकल खरेदीसाठी येणारा एक लाख रूपयांचा खर्च, जगाच्या नकाशावर वाईचे नाव कोरण्याची प्रसादची धडपड आणि त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हेच शक्य झाले आहे, असे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले.
प्रसादने गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुमारे सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून पुण्यातून महामार्गावरून सात राज्यातील सायकल प्रवासासाठी जाताना त्याने वाईकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. (प्रतिनिधी)

-प्रसादने सायकल प्रवासादरम्यान पर्यावरण रक्षण, स्त्री भ्रुणहत्या व सायकल चालविण्याचे महत्व याचा प्रसार आणि प्रचार केल्याचे सांगितले.
-या स्पर्धेसाठी जगातील सहा सायकलपट्टंू सवेत निवड झालेला प्रसाद एरंडे हा महाराष्ट्र-भारतातील एकमेव स्पर्धक आहे.

जागतिक सायकल स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली असून दक्षिण काशी वाईसह सातारा जिल्ह्याचे नांव जगाच्या नकाशावर कोरण्याचे माझे स्वप्न पूर्ण आता लवकरच पूर्ण होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वांनी दिलेले बळ हेच माझे प्रेरणास्थान आहे.
-प्रसाद एरंडे

Web Title: Yacht cyclist left for a record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.