शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

भारत जोडो पेक्षा पक्ष जोडण्याचे काम करा, रामदास आठवले यांचा राहूल गांधी यांना टोला 

By दीपक देशमुख | Updated: March 2, 2024 17:06 IST

आरक्षणाचा प्रश्न मार्गी, जरांगे-पाटील यांनी आंदोलन थांबवावे

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक मोठे नेते महायुतीत येत आहेत. पक्ष फुटत चालला आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी भारत जोडण्याचे सोडून स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. जे लोक पक्ष सोडून चालले आहेत, त्यांना थांबवण्यासाठी थोडा वेळ द्यावा. देशभर फिरून त्यांना फारसा लाभ होणार नाही, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला.सातारा येथे शासकीय विश्रामागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री आठवले म्हणाले, महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरू आहे. रिपाइंनेही सोलापूर आणि शिर्डी दोन जागांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यसभेत खासदार असलो तरी लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डीतून माझा पराभव झाला होता. यावेळी शिर्डीतून पुन्हा निवडून यायचे असल्याचा मानस आठवले यांनी व्यक्त केला.शिवसेना-भाजपा युती २७ वर्षे होती. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं सोबत आल्यानंतर युतीची महायुती झाली. आता मोठे मित्रपक्ष आल्यानंतर आमचे नाव कुठे येत नाही. रिपाइंचा मतदार इमानदार असून मी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देणारा आहे. रिपाइंं छोटा पक्ष असला तरी गावा-गावात कार्यकर्त्यांची फळी आहे. या कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. सातारा लोकसभेची जागा रिपाइंने मागितलेली नाही. सातारा लोकसभा भाजपाने लढावी, अशी आमची अपेक्षा असून खा. उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्यास रिपाइं त्यांच्यासाेबत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदाच्या उमेदवार कोण याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, त्या आ आघाडीत पंतप्रधान पदासाठी २० ते २५ उमेदवार आहेत. प्रत्येक पक्षाचा नेते इच्छुक आहे. नितीश कुमार महायतीत आले आहेत. ममता बॅनर्जी स्वतंत्र लढणार आहेत.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी, जरांगे-पाटील यांनी आंदोलन थांबवावेमनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनांमुळे आरक्षण कार्यवाहीला गती आली. सरकारनेही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दहा टक्के आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागलेला नाही. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये तर शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन आठवले यांनी केले.

डॉ. आंबेडकर स्मारकाची अनेक कामे काँग्रेस काळात रखडलीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची अनेक कामे प्रलंबीत होती. काँग्रेसला लक्ष द्यायला वेळ नव्हता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. इंदू मीलच्या ठिकाणी स्मारकाचे काम वेगाने सुरू असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस