शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
5
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
6
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
7
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
8
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
9
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
10
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
11
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
12
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
14
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
15
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
16
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
17
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
18
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
19
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
20
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स

आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार

By admin | Updated: May 2, 2017 23:54 IST

आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार

ग्रामसभांमध्ये ‘तुफान आलं या’ : भविष्यात कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्याचा निर्धारसातारा : राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून काही अंतरावर दारूविक्री करणारे दारू दुकान व बिअर बार बंद करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला. त्यामुळे त्या दुकानदारांनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले. पण वेळीच सावध होत गावोगावच्या महिलांनी महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत दारूच्या हद्दपारीचा निर्धार केला.दारूबंदीच्या चळवळीत सातारा जिल्हा कायमच अग्रेसर राहिला आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदानाद्वारे बाटली आडवी केली. या चळवळीची राज्यभरात दखल घेतली गेली. त्यातून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्धार करण्यात आला होता. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दारूविक्रीस बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतचे दारू, बिअर बार व परमिट रूमचालकांना बसला. त्यामुळे ते ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून व्यसनमुक्त चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी होणार असलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक गावांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दारूबंदीचा ठराव केला. (प्रतिनिधी) वाठार स्टेशन : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त घेतलेल्या देऊरच्या ग्रामसभेत गावातून दारू कायमची हद्दपार होण्याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी कृषी मालास हमीभावाचा ठरावही संमत करण्यात आला. देऊरला ‘नो दारू’चा ठरावयावेळी गावच्या कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेबाबत गावानजीक असलेल्या तळहिरा पाझर तलावातून नवीन योजना मंजूर करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानाबाबत तसेच गावातील बंद पडलेल्या आणि दुरवस्था झालेल्या शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपसरपंच बाळासाहेब कदम, प्रदीप कदम, राजेंद्र कदम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक राहुल कदम यांनी आभार मानले. दारूविरोधात वडूथला महिलांनी आवळली मूठशिवथर : सातारा तालुक्यातील वडूथ हद्दीत सर्व प्रकारच्या दारू विक्रीला कायमची बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सोमवारच्या ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी हात उंचावून ठराव मंजूर केला. वडूथमध्ये अनेक वर्षांपासून शासनमान्य देशी दारूचे दुकान सुरू होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, दारू दुकान शासनमान्य असल्यामुळे कोणीच काही करत नव्हते. शासनाच्या नव्या नियमानुसार २२० मीटरच्या आत देशी-विदेशी दारू दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक होऊन दारूबंदीचा ठराव आणला.