शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांनी स्वराज्याचा पाया घातला तर गांधींनी कळस चढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे ...

कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे होते. मात्र, त्यांनी स्वातंत्र्य हा शब्द न वापरता ‘स्वराज्य’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला. लोकांच्यात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष तयार केला. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा पाया रचला, तर महात्मा गांधींनी त्यावर कळस चढविला असे म्हणावे लागते,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ‘लोकमान्य टिळक’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. विनोद शिरसाठ, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी इथल्या जनतेला ब्रिटिशांची शोषकवृत्ती पटवून दिली. स्वराज्याची सर सुराज्याला येत नाही. तेही सांगितले. हे सर्व जनतेला पटल्यावर बहिष्काराचे अस्त्र त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिले. पुढे महात्मा गांधीजींनी त्याचा चांगला वापर केला. म्हणूनच स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा मार्ग सापडत गेला. खरंतर काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणाचे स्वातंत्र्य? कशाचे स्वातंत्र्य? कोणासाठी स्वातंत्र्य? या चर्चा सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी शाळा, कॉलेज, रस्ते, रेल्वे आदी सुधारणा केल्या होत्या. त्या जरी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केल्या असल्या तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीयांना झाला होता. भारतीय शहाणे व्हायला लागले होते.’

विनोद शिरसाठ म्हणाले, ‘ग. प्र. प्रधान व ए. के. भागवत यांनी त्या काळात लोकमान्य टिळकांवर इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले चरित्र आज मराठीत अनुवादित करण्यात आले आहे. याचा अभ्यासकांना नक्कीच फायदा होईल.’

ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, ‘ दादा उंडाळकर स्मारक समिती नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. दिवंगत विलासराव पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गाने आमची वाटचाल सुरू असून, यापुढील काळात ती कायम राहील.’ कार्यक्रमाचे राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो आहे..

कऱ्हाड येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्रा डाॅ. सदानंद मोरे, व्यासपीठावर गणपतराव कणसे, विनोद शिरसाठ, ॲड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.