शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

CoronaVirus Lockdown : पोटासाठी काय पण: खाण्यासाठी पशुपक्षी थेट गावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:08 PM

शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.

ठळक मुद्दे पोटासाठी काय पण: खाण्यासाठी पशुपक्षी थेट गावात!नागरिक करतायत पशु-पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था

रशिद शेखऔध: शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.यंदा कोरोनामुळे पशुपक्ष्यांना नागरिकांचे दर्शन दुर्मीळ झाले होते. बाजार, मंडई भरत नसल्याने पक्षी तसेच वानरसेना आता घरोघरी पोहोचू लागले आहेत. औंध परिसरातील अनेक गावांमधील नागरिक पशुपक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्था करू लागले आहेत. अनेक गावांमध्ये तरकारी उत्पन्न घेणारे शेतकरी यंदा निवांतच असल्याने उन्हाळ्यात पक्ष्यांचे व विशेषत: वानरसेनेचे पोटाचे हाल होत आहेत.अनेक ठिकाणचे पाणवठे, जलसाठे मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहेत. अजूनपर्यंत शेतांमधील सुगीला सुरुवात नाही. सर्वत्र रुक्ष वातावरण निर्माण झाले आहे. त्याची झळ अनेक पशु-पक्ष्यांना बसू लागली आहे. शेते मोकळी झाल्याने या प्राण्यांना त्याठिकाणी खायला काहीच उपलब्ध नाही.

पाणीसाठे मोकळे झाल्याने अन्नपाण्याच्या शोधासाठी वानरे, पक्षी व अन्य प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये औंध, कुरोली, जायगाव, खरशिंगे, गोपूज व अन्य गावे वाड्या-वस्त्यांवरील वस्त्यांमध्ये त्यांनी ठाण मांडल्याने हे प्राणी माणसाळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अन्नपाणी दिले जात आहे. पण काही ठिकाणी त्यांची भटकंती सुरू आहे. पुढील दोन महिने या मुक्या जीवांचे कसे जाणार? याचीच धास्ती निर्माण झाली आहे.मुक्या प्राण्यांसाठी संघटनांनी पुढाकार घ्यावा..औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी औंध येथील डोंगर परिसरात पक्ष्याचा वावर असलेल्या जवळपास वीस ठिकाणी दीड लिटर पाणी बसेल एवढे कॅन झाडांना अडकवून त्यांची व्यवस्था केली आहर. एक दिवसाआड त्यामध्ये पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पक्षी तेथे आपली तहान भागवतात. अशा अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आमच्या घराच्या गच्चीवर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी माकडे येत असतात. आम्ही त्यांना भाकरी, चपाती तसेच अन्य खाद्यपदार्थ खाण्यासाठी देतो. अगदी माणसाळलेले आहेत. मुलेही जवळ जाऊन त्यांना खाऊ घालतात.-दीपक नलवडे,उपसरपंच, औंध

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरwildlifeवन्यजीव