शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Satara: धरणांतील पाण्याबाबत ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा; समाधान नाहीच..

By नितीन काळेल | Updated: January 24, 2024 18:58 IST

जिहे कटापूर योजना: दोन दिवसांत पुढील निर्णयाची शेतकऱ्यांची भूमिका

सातारा : जिहे-कठापूर योजनेसाठी धरणातून पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागासमोर ठिय्या मांडल्यावर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई असल्याने पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत पुढील भूमिका ठरवू, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत सातारा, काेरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली.पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच पाटबंधारे कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आश्वासनानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, ज्येष्ठ नेते यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, धोम संघर्ष समितीचे रणजित फाळके, नंदकुमार पाटील, बर्गे सर, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, धनाजी घाडगे, भरत देशमुख, नितीन काळंगे, दीपक पवार, लालासो पवार, जगन्नाथ जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्व भागात टंचाई आहे. त्यामुळे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक करता येत नाही असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी वेण्णा, कृष्णा नदीकाठच्या शेतीपंपाच्या वीजजोडण्या पूर्ववत करण्याचे आदेश दिले, अशी माहितीही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली.

जिहे-कठापूर पाणी योजना बेकायदेशीरपणे सुरू आहे. नियमाचा भंग करुन पाणी नेले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. यावेळी त्यांनी पिण्यासाठी पाणी सोडल्याचे सांगितले. यामुळे आमचे समाधान झालेले नाही. दोन दिवसांत पुढील भूमिका ठरविणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी