शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Satara: धरणांतील पाण्याबाबत ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा; समाधान नाहीच..

By नितीन काळेल | Updated: January 24, 2024 18:58 IST

जिहे कटापूर योजना: दोन दिवसांत पुढील निर्णयाची शेतकऱ्यांची भूमिका

सातारा : जिहे-कठापूर योजनेसाठी धरणातून पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागासमोर ठिय्या मांडल्यावर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई असल्याने पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत पुढील भूमिका ठरवू, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत सातारा, काेरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली.पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच पाटबंधारे कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आश्वासनानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, ज्येष्ठ नेते यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, धोम संघर्ष समितीचे रणजित फाळके, नंदकुमार पाटील, बर्गे सर, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, धनाजी घाडगे, भरत देशमुख, नितीन काळंगे, दीपक पवार, लालासो पवार, जगन्नाथ जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्व भागात टंचाई आहे. त्यामुळे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक करता येत नाही असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी वेण्णा, कृष्णा नदीकाठच्या शेतीपंपाच्या वीजजोडण्या पूर्ववत करण्याचे आदेश दिले, अशी माहितीही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली.

जिहे-कठापूर पाणी योजना बेकायदेशीरपणे सुरू आहे. नियमाचा भंग करुन पाणी नेले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. यावेळी त्यांनी पिण्यासाठी पाणी सोडल्याचे सांगितले. यामुळे आमचे समाधान झालेले नाही. दोन दिवसांत पुढील भूमिका ठरविणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी