शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

Satara: धरणांतील पाण्याबाबत ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा; समाधान नाहीच..

By नितीन काळेल | Updated: January 24, 2024 18:58 IST

जिहे कटापूर योजना: दोन दिवसांत पुढील निर्णयाची शेतकऱ्यांची भूमिका

सातारा : जिहे-कठापूर योजनेसाठी धरणातून पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागासमोर ठिय्या मांडल्यावर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई असल्याने पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत पुढील भूमिका ठरवू, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत सातारा, काेरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली.पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच पाटबंधारे कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आश्वासनानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, ज्येष्ठ नेते यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, धोम संघर्ष समितीचे रणजित फाळके, नंदकुमार पाटील, बर्गे सर, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, धनाजी घाडगे, भरत देशमुख, नितीन काळंगे, दीपक पवार, लालासो पवार, जगन्नाथ जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्व भागात टंचाई आहे. त्यामुळे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक करता येत नाही असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी वेण्णा, कृष्णा नदीकाठच्या शेतीपंपाच्या वीजजोडण्या पूर्ववत करण्याचे आदेश दिले, अशी माहितीही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली.

जिहे-कठापूर पाणी योजना बेकायदेशीरपणे सुरू आहे. नियमाचा भंग करुन पाणी नेले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. यावेळी त्यांनी पिण्यासाठी पाणी सोडल्याचे सांगितले. यामुळे आमचे समाधान झालेले नाही. दोन दिवसांत पुढील भूमिका ठरविणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी