शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

पाण्यासाठी वाटा फुटल्या; सातारा जिल्ह्यात दोन लाख नागरिकांच्या घशाला कोरड, टॅंकरने पाणीपुरवठा सुरु

By नितीन काळेल | Updated: March 12, 2024 15:59 IST

मिळेल तेथून आणावे लागतयं पाणी 

सातारा : जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढत असून सध्या ११९ गावे आणि ३८८ वाड्यांना झळ पोहोचली आहे. यासाठी ११२ टॅंकर सुरू असून त्यावर २ लाख ११ हजार नागरिकांची तहान अवलंबून आहे. तरीही टॅंकरचे पाणी पुरत नसल्याने लोकांच्या पाण्यासाठी वाटा फुटल्या आहेत. मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. तर एप्रिल आणि मे महिना आणखी तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे यावर्षी टंचाईची स्थिती वाढली आहे. त्यातच गेल्यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात अनेक गावांत टॅंकर सुरू झाले होते. अशा अनेक गावांत एक वर्षापासूनचा टॅंकरचा फेरा सुटलेला नाही. तर सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने टॅंकरला मागणी वाढली आहे. गावागावांतून प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात.

माण तालुक्यात सर्वाधिक दाहकता

माण तालुक्यात दाहकता सर्वाधिक आहे. ५१ गावे आणि २९९ वाड्यांसाठी ५४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव तालुक्यातही टंचाई वाढत असून सध्या २३ गावे आणि ९ वाड्यांना झळ पोहोचलीय. यासाठी २१ टॅंकर सुरू असून ४९ हजार नागरिक आणि सुमारे पाच हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी आदी ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर फलटण तालुक्यातही २० गावे आणि ७५ वाड्यांसाठी १४ टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातील २२ गावे टंचाईत आहेत. खंडाळा तालुक्यातही एका गावासाठी टॅंकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि ३ वाड्यांसाठी २ टॅंकर सुरू आहेत. पाटण तालुक्यातील दोन वाड्यांसाठी पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 

सवा लाख पशुधन बाधित; १०३ खासगी टॅंकर सुरू..जिल्ह्यात सध्या १ लाख २२ हजार ६३२ जनावरांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर सध्या ११२ टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरबरोबरच खासगी विहिरी आणि बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणी मिळविण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी