शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली; सव्वा लाख लोकांच्या घशाला कोरड

By नितीन काळेल | Updated: August 22, 2023 17:22 IST

पावसाची दडी कायम असल्याने टंचाई स्थिती वाढू लागली

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असल्याने टंचाई स्थिती वाढू लागली आहे. त्यातच चारच दिवसांत नवीन २५ हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ७५ गावे आणि तब्बल ४०० वाड्यांना ७६ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ६५ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.जिल्ह्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. पण, हा पाऊस पश्चिम भागातच चांगला झाला. पण, पूर्व भागात अडीच महिन्यांपासून दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे. त्यामुळे पूर्वेकडे एप्रिल महिन्यापासून सुरू झालेले टॅंकर बंद झाले नाहीत. या उलट टंचाईची दाहकता वाढत चालली आहे. जनावरांना चारा नाहीच. पण, आता पशुधनाला पाणी कोठून आणायचे याचीही विवंचना आहे. त्यातच अनेक गावांतील आणि वाड्यावस्तीवरील लोकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनेही टॅंकरचे नियोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या ७५ गावे आणि ४०० वाड्यांना टंचाईची झळ पोहाेचली आहे. त्यामुळे ७६ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यामधील ४५ गावे आणि ३२९ वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ५१ टॅंकर सुरू करण्यात आले असून यावर ७० हजार ३८८ नागरिक आणि ३९ हजार ३७६ पशुधनाची तहान अवलंबून आहे. खटाव तालुक्यातही टंचाईत वाढ झालेली आहे. त्यामुळे सध्या १४ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आला आहे. १० टॅंकरवर २० हजार नागरिक आणि ७ हजार ५४६ नागरिकांची तहान अवलंबून आहे. फलटण तालुक्यातही दाहकता वाढत चालली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढून ८ झाली आहे. तर ४७ वाड्यांनाही टॅंकरचा आधार आहे. १८ हजार नागरिक आणि १६ हजार जनावरांना टॅंकरचे पाणी देण्यात येत आहे.

सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगावात टंचाई आहे. कोरेगाव तालुक्यातही ६ गावांतील साडे तीन हाजर नागरिक आणि २ हजार जनावरांसाठी ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाईची स्थिती आहे. वाई ताुलक्यातही दोन गावांतील १ हजार ६८९ नागरिक आणि ४७५ पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. सध्या सातारा, पाटण, जावळी, कऱ्हाड, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यात टॅंकर सुरू नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस