शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

By नितीन काळेल | Updated: July 17, 2024 19:29 IST

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात हुलकावणीही आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असलातरी अजूनही जिल्ह्यातील २३ गावे आणि ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील सर्वाधिक गावे आणि वाड्या या माण तालुक्यात आहेत. तर वाई, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यातही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झालेली.परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. तर यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती गडद झाली. त्यामुळे २०० हून अधिक गावे आणि ७१६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. तसेच बहुतांशी ठिकाणी चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत गेली. तरीही जिल्ह्यातील काही भागात अजूनही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजूनही २३ गावे आणि ११३ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १७ गावे आणि ११२ वाड्यांसाठी १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर ४२ हजारांवर नागरिकांची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव आणि वाकी गावांसह वाडीवस्त्यांवर टँकर सुरू आहे. खटाव तालुक्यात टंचाई कमी झाली आहे. सध्या ३ गावे आणि एका वाडीसाठी २ टँकर सुरू आहेत. यावर २ हजार नागरिक आणि ९९६ पशुधन अवलंबून आहे. शिंदेवाडी, नवलेवाडी आणि गारळेवाडी येथे टंचाई आहे.कोरेगाव तालुक्यात भाडळे येथेच टंचाई आहे. गावातील ३ हजार २७८ नागरिक आणि ३ हजार १४२ पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यातही एकाच गावात पाण्याची भीषण स्थिती आहे. निंबोडीतील २२६ ग्रामस्थ आणि ३५१ पशुधनासाठी टँकर सुरू आहे. वाई तालुक्यातही आनंदपूर येथे टंचाई आहे. याठिकाणीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

४८ हजार नागरिकांसाठी २० टँकर सुरूजिल्ह्यात सध्या अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या २० टँकरद्वारे सुमारे ४८ हजार नागरिक आणि ४ हजार ६७४ पशुधनाला पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर टंचाई निवारणासाठी ११ विहिरी आणि ३ बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात एक विहीर आणि ३ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळ