शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

By नितीन काळेल | Updated: July 17, 2024 19:29 IST

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात हुलकावणीही आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असलातरी अजूनही जिल्ह्यातील २३ गावे आणि ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील सर्वाधिक गावे आणि वाड्या या माण तालुक्यात आहेत. तर वाई, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यातही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झालेली.परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. तर यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती गडद झाली. त्यामुळे २०० हून अधिक गावे आणि ७१६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. तसेच बहुतांशी ठिकाणी चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत गेली. तरीही जिल्ह्यातील काही भागात अजूनही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजूनही २३ गावे आणि ११३ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १७ गावे आणि ११२ वाड्यांसाठी १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर ४२ हजारांवर नागरिकांची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव आणि वाकी गावांसह वाडीवस्त्यांवर टँकर सुरू आहे. खटाव तालुक्यात टंचाई कमी झाली आहे. सध्या ३ गावे आणि एका वाडीसाठी २ टँकर सुरू आहेत. यावर २ हजार नागरिक आणि ९९६ पशुधन अवलंबून आहे. शिंदेवाडी, नवलेवाडी आणि गारळेवाडी येथे टंचाई आहे.कोरेगाव तालुक्यात भाडळे येथेच टंचाई आहे. गावातील ३ हजार २७८ नागरिक आणि ३ हजार १४२ पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यातही एकाच गावात पाण्याची भीषण स्थिती आहे. निंबोडीतील २२६ ग्रामस्थ आणि ३५१ पशुधनासाठी टँकर सुरू आहे. वाई तालुक्यातही आनंदपूर येथे टंचाई आहे. याठिकाणीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

४८ हजार नागरिकांसाठी २० टँकर सुरूजिल्ह्यात सध्या अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या २० टँकरद्वारे सुमारे ४८ हजार नागरिक आणि ४ हजार ६७४ पशुधनाला पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर टंचाई निवारणासाठी ११ विहिरी आणि ३ बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात एक विहीर आणि ३ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळ