शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कालव्यात पाणी सोडले; सातारा, सांगलीच्या चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:01 IST

पिकांना संजीवनी 

कऱ्हाड : कऱ्हाडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने सोमवारपासून कालव्यात २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, या आवर्तनाचा कालावधी २५ दिवसांचा आहे. त्यामुळे चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात संजीवनी मिळणार आहे.कऱ्हाड तालुक्यात खोडशी येथे कृष्णा नदीवरून कॅनॉलला प्रारंभ झाला आहे. हा कालवा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील ३४ गावातून वाहत जाऊन येरळाला मिळतो. सुमारे ८६ किलोमीटर लांबीच्या या कॅनॉलवर शेती, पशुधन तसेच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे. ३४ गावे व सुमारे १३ हजार ३६० हेक्टर शेतीक्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. गत महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सध्या कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होती. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे तसेच पाणी नसल्यामुळे पिके होरपळत होती. त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता सोमवारपासून कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा कॅनॉलमध्ये विसर्ग केला जात असून, हे पाणी कऱ्हाडसह चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला संजीवनी देणारे ठरणार आहे. २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बी. आर. पाटील यांनी दिली.

चार स्टेशनवर पाण्याची उपलब्धताकृष्णा कॅनॉलचे चार स्टेशन आहेत. या स्टेशननुसार पाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना करून दिली जाणार आहे. नियोजनानुसार सांगली जिल्ह्यातील येळावीला सुरुवातीला पाणी उपलब्ध होणार असून, त्यानंतर किर्लाेस्करवाडी, ताकारी आणि अखेरच्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यातील शेणोली स्टेशनअंतर्गत शेतीला पाणी पुरवठा होणार आहे.

कृष्णा कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतजमिनीला पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. सोमवारपासून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले असून, २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढेही नियोजनानुसार पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. - बी. आर. पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीWaterपाणीfarmingशेती