शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Satara: कोयना धरणातून पुन्हा पाणी सोडले, पावसामुळे आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:51 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात परतीचा पाऊस अजूनही पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पाऊस होत आहे. यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच ओढे खळाळून वाहत आहेत. तसेच पश्चिम भागातही पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात सुमारे अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा १०४.८२ टीएमसी झाला होता. पाणीसाठ्याची टक्केवारी ९९.५९ झाली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. त्यातून १ हजार ५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरलाही २८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे.जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ८१७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यानंतर महाबळेश्वरला ६ हजार ५७० आणि कोयना येथे ५ हजार ६९६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम भागातील कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे भरलेली आहेत. सध्या या सर्वच धरणांत १४८ टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी