शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी

By नितीन काळेल | Updated: August 21, 2023 18:53 IST

अधिकाऱ्यांपुढे मांडले गाऱ्हाणे 

सातारा : माण तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला असून प्यायला पाणी आणि जनावरांना चारा नाही. त्यामुळे दुष्काळाचे ढग दाटत असल्याने तालुक्यातील वरकुटे मलवडी, कुरणेवाडी, बनगरवाडी आणि महाबळेश्वरवाडीच्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी साताऱ्यात धडक मारली. पालकमंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना भेटून चारा आणि पिण्याच्या पाण्याची मागणी केली. तसेच टेंभू योजनेचे पाणी सोडणे आणि पीक विमा रक्कम लवकर देण्याचीही मागणी करण्यात आली.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तरीही माण तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. सध्या निम्म्या तालुक्याला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर जनवारांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. विकतचा चारा परवडेनासा झाला आहे. यामुळे जनवारांसाठी चारा छावण्या सुरू तसेच पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. यातूनच वरकुटे मलवडी परिसरातील चार गावचे शेतकरी सोमवारी साताऱ्यात आले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही निवेदन देत आपल्या भावना मांडल्या.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आले होते. यामध्ये संजय जगताप, विजय जगताप, विक्रम शिंगाडे, सतीश जगताप, अंकुश गाढवे, किरण खवळे, कुबेर आटपाडकर, विलास आटपाडकर, बंडू आटपाडकर, दिगंबर जगताप, भागवत पिसे, सुनील थाेरात, नाथा गळवे, चंद्रकांत कोठावळे, दिलीप आटपाडकर, सीताराम आटपाडकर, दत्तात्रय नरळे, महावीर काटकर, संदीप खरात, गोटू आटपाडकर, लक्ष्मण आटपाडकर आदी सहभागी झाले होते.याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्याच्या पूर्वेकडील वरकुटे मलवडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी आणि काळचाैंडी या गावच्या पाणीपुरवठा विहिरी या महाबळेश्वरवाडी तलावावर अवलंबून आहेत. सध्या हा तलाव कोरडा पडलेला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठलाय. गावांना पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या तलाव्यात पाणी सोडण्यासाठी टेंभू योजनेतून दोन ठिकाणी पाईपलाईन जोडलेल्या आहेत. त्यामधील कोरेवाडी, लाडेवाडीला पाणी साेडले जाते. मात्र, अनेक छोटे तलाव भरल्यानंतर पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येते. या लाइनवरील सर्व तलाव भरुन दिल्यानंतर टेंभूचे पाणी सोडण्याचे दुसरे ठिकाण हांडेवास्ती आहे. या हांडेवस्तीवरील पाणीपुरवठा व्हाॅल्वमधून महाबळेश्वरवाडी तलावात पाणी सोडावे ही विनंती आहे.

कुरणेवाडी गावासाठी टेंभू योजनेचे पाणी पडळकर खडक तलावात सोडावे. कारण, या भागात प्रचंड दुष्काळ आहे. सध्यस्थितीत गावासाठी पाणी टॅंकरही सुरू आहे. टेंभू योजनेतून सीमेवरील सांगली जिल्ह्यात पाणी सोडले जात आहे. पण, सातारा जिल्ह्यातील कुरणेवाडीसाठी टेंभूचे पाणी सोडत नाहीत. यामुळे लोक दुष्काळाने होरपळत आहेत. त्यातच कुरणेवाडी ग्रामस्थांना दुषित पाणीपुरवठा केला जातोय. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याची दखल घेऊन कुरणेवाडीसाठी टेंभू योजनेचे पाणी सोडावे. नाहीतर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी