शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कऱ्हाडमध्ये रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 16:35 IST

कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला.

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला. पहाटेपासून दुपारपर्यंत हे रसायन ओढ्याच्या पाण्यात मिसळत होते.  संबंधित ओढा पुढे कृष्णा नदीत मिसळल्यामुळे हे रसायन नदीच्या पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कऱ्हाडपासून काही अंतरावर पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर तासवडे येथे औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारा धूर आणि रसायनयुक्त पाणी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यापूर्वीही याच कारणावरून काहीवेळा वादही निर्माण झाला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. रविवारीही येथील रसायन तासवडे आणि बेलवडे हवेली गावाच्या मध्यावर असणाऱ्या ‘पिर’ नावाच्या ओढ्यात मिसळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधित ओढ्याला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे ओढा वाहता आहे. याच पाण्यात पहाटेपासून रसायन मिसळत होते. त्यामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे लाल झाला.

संबंधित ओढ्यातील पाणी आसपासचे शेतकरी जनावरांसाठी तसेच शेतीसाठीही वापरतात. मात्र, ओढ्यातील पाण्यात रसायन मिसळल्याने आणि पाण्याचा रंग बदलल्यामुळे रविवारी एकाही शेतकऱ्याने जनावरांना ते पाणी दिले नाही. हा ओढा तासवडे आणि बेलवडे हवेली गावच्या शिवारातून पुढे जात कृष्णा नदीत मिसळतो. त्यामुळे रसायनमिश्रीत पाणी नदीपात्रामध्ये जाणार असून, नदीतील पाणीही दूषित होण्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रविवारी दुपारपर्यंत ओढ्याच्या पाण्यात हे रसायन मिसळत होते. मात्र, एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीFarmerशेतकरी