शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

Satara: कोयनेतील पाण्याची आवक थांबली; नवजाला दोन मिलीमीटर पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:08 IST

धरणांत पूर्ण पाणीसाठा होण्यासाठी अजूनही किती टीएमसी पाण्याची आवश्यकता.. वाचा

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून २४ तासांत नवजा येथे दोन तर महाबळेश्वरला एक मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरणक्षेत्रात ही पावसाची विश्रांती आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही पूर्णपणे थांबली आहे. पाणीसाठा ८७.४५ टीएमसीवर स्थिर आहे.जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. पण, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने सुटी घेतल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम भागातीलच कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत नाही.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे पाऊस पडल्याची नोंद नाही. नवजा आणि महाबळेश्वरला किरकोळ नोंद झाली. त्याचबरोबर प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ८७.४५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १७ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर सध्या धोम धरणात १२.५९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. बलकवडीत ३.७६, कण्हेर ९.४४, उरमोडी धरणात ९.३८ आणि तारळी धरणात ५.१६ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. ही प्रमुख धरणे सुमारे ८६ टक्के भरली आहेत. तर या धरणांत पूर्ण पाणीसाठा होण्यासाठी अजूनही २० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

महाबळेश्वरला ३,५६८ मिलीमीटर पर्जन्यमान..जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पाऊस सुरू आहे. आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद पाथरपूंज येथे झालेली आहे. त्यानंतर महाबळेश्वर येथे ३ हजार ५६८ तर नवजाला ३ हजार ४४५ आणि कोयनानगरला ३ हजार ७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे.