शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

कोरेगाव तालुक्यातील रेवडी-परतवडीला जोडणार वसना पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 1:10 PM

कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ठळक मुद्देवसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था, अस्तित्व धोक्यात सिमेंट पाईपला तडे; रस्त्यातही खड्डे वाहनधारक करतात जीव मुठीत घेऊन प्रवास

वाठार स्टेशन , दि. २१ : कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

रेवडी गावामधून परतवडी व भक्तवडी या दोन गावांमध्ये जाण्यासाठी १९८० साली वसना नदीवर पूल उभारण्यात आला. सिमेंटच्या पाईपचा वापर करुन साधारण २०० ते २५० फूट लांबीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला.

हा पूल गेल्या दोन वर्षांपासून खचू लागला आहे. तसेच अवजड वहानांमुळे अनेक ठिकाणी सिमेंटच्या पाईपला तडे गेले असून पुलावरील संपूर्ण डांबरी भाग निघुन गेला आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्याने या पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

उंची कमी असल्याने हा पुल कोणत्याही क्षणी पाण्यात जाऊ शकतो. पुलाची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन बांधकाम विभागाने तत्काळ या पुलाची दुरस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ तसेच वाहनधारकांमधून होत आहे.

रेवडी गावातून परतवडी-भक्तवडी या गावांना जोडणारा वसना नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुलाची तातडीने दुरूस्ती न केल्यास दोन गावांचा संपर्क तुटणार आहे- नरसिंग दिसले,ग्रामस्थ परतवडी

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाriverनदी