शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्तकडे वाटचाल

By admin | Updated: July 29, 2016 23:27 IST

खोरेमुक्तीसाठी प्रयत्न : शिवारात जागोजागी पाण्याचे साठे!

सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद काय असते, ते शासनाचे जलयुक्त शिवार अभियान राबवून दाखवून दिले आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे संघटितपणे केल्याने आज विसापूरच्या शिवारात जागोजागी पाण्याचे साठे पाहायला मिळत आहेत. जलयुक्त बनलेल्या विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे जाणारी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी बनेल. डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरची लोकसंख्या अवघी ५ हजार. गावचे पर्जन्यमान सरासी ६५० ते ७०० मि.मी. गावामध्ये ५७६ हेक्टर बागायत क्षेत्र, ६५० जिरायत क्षेत्र तर पडीक क्षेत्र व डोंगरमाथा ते पायथा ४१७.८७ हेक्टर असे एकूण १६४४.६७ हेक्टर भौगोलिक क्षेत्र. गावामध्ये असणारे राम ओढ्याचे तसेच गाव ओढ्याचे लोक वर्गणीतून रुंदीकरण व खोलीकरण केले. या ओढ्यांवर १६ वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून २.२५ कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे. लोकवर्गणी, कृषी विभाग, यांत्रिकी विभाग यांच्या मदतीने माथा ते पायथा या संकल्पनेनुसार गावामध्ये ४५० हेक्टर डीपसीसीटी काम पूर्ण केलेले आहे. इजाळीमधून ७ हजार ४४० क्युबीक मीटर, वाणदरामधून ९९२० क्युबीक मीटर, आवारवाडीमधून ८०८० क्युबीक मीटर तर कोकाटेमधून ३२०० क्युबीक मीटर अशा चार पाझर तलावांमधून एकूण २८ हजार ६४० क्युबीक मीटर गाळ लोकसहभाग व यांत्रिकी विभाग आलोरे यांच्या मदतीने काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकून शेत जमीनही वहिवाटीत आणली आहे. लोकवर्गणीतून ६ माती नालाबांधमधून गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. लोकवर्गणीतून ५ सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढला आहे. रोजगार हमी योजनेतून ५ विहिरींचे व २ विंधन विहिरींचे पुनर्भरण केले आहे. टंचाईमुक्तीचा शिक्का विसापूरकरांनी आपल्या कामातून पुसून टाकला आहे. जलयुक्तकडून ठिबकयुक्तकडे आणि खोरेमुक्तीकडे विसापूरची वाटचाल ही अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी) गाव ठिबकयुक्त करणारजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्ररणेने जनजगृती करून लोकसहभागातून १६ वनराई बंधारे बांधून सुमारे अडीच कोटी लिटर पाणीसाठा निर्माण केला आहे. अवघ्या दीड महिन्यात ४५० हेक्टर सीसीटीचे काम पूर्ण केले. यामध्ये यांत्रिकी विभागामार्फत १०० ते ११० हेक्टर आणि उर्वरित लोकसहभागातून करण्यात आलेले आहे. सध्या गावामध्ये कृषी विभाग आणि स्थानिकस्तर यांच्या माध्यमातून १४ सिमेंट बंधारे उपलब्ध झाले आहेत. गावामध्ये निर्माण झालेला पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी गाव ठिबकयुक्त आणि खोरेमुक्त करत आहोत. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याची भावना सरपंच सागर साळुंखे यांनी बोलून दाखविली.