शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:34 IST

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

ठळक मुद्देलोकसहभागाच्या कामाला यश -भविष्यातील चिंता मिटणारगावोगावच्या तलावांत पाणी साचू लागले

खंडाळा : तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गावोगावी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आणि परिसरातील तलावांत खडखडाट झाला होता. भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून गाळमुक्तीचे अभियान राबविण्यात आले होते. पावसाळा सुरू होताच तलाव, बंधारे यातून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे गाळमुक्तीच्या माध्यमातून जलसंचय करण्यात यश मिळाले आहे. याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असल्याने शेतकरीही समाधानी आहेत.शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शासनाच्या योजनेतून गाळ उपसण्यासाठी लागणाºया यंत्राच्या इंधनाचा खर्च काही ठिकाणी करण्यात आला होता तर अनेक गावांतून सामाजिक संघटना आणि लोकसहभागातून गाळ उपसण्यात आला. यातून शेतकऱ्यांना केवळ वाहतूक खर्चात स्वत:च्या शिवारात गाळ भरता आला. त्यामुळे माळरानाच्या मुरमाड जमिनी लागवडीखाली येण्यास मदत झाली.लोकसहभागाच्या माध्यमातून गाळमुक्तीचा हा जागर संपूर्ण तालुक्यात राबला. या मोहिमेतून तलाव, ओढे आणि छोटे बंधारे यांचे खोलीकरण होऊन लाखो लिटर पाण्याचा संचय वाढविला आहे. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी प्रत्येक कामावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांना या योजनेसाठी प्रेरित केले. जलसंधारणाच्या या कामामुळे भविष्यात होणारे फायदे याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे लोकजागृती अधिक प्रमाणात झाली. त्यामुळे या मोहिमेला बळकटी मिळाली त्यातूनच जलसंचयनाचे मोठे काम उभे राहिले. आता पावसाने याच तलावातून पाणी साचू लागल्याने भविष्यातील चिंता मिटणार आहे.सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग...गाळमुक्ती करून पाणीसाठा वाढावा, यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. यामध्ये काही लोकांनी मशिनरी, कंटेनर, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले तर काही लोकांनी वर्गणी काढून या कामाला हातभार लावला, त्यामुळे तालुक्यात हे काम यशस्वीपणे मोठ्याप्रमाणात झाले.खंडाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच यावर्षी गावोगावी पाण्याची कमतरता भासली. भविष्यात अडचणी येऊ नयेत म्हणूनच पाणी साठवण प्रमाण वाढणे गरजेचे होते. त्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, बंधारे, छोटी धरणे यातील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तालुक्यात विशेष मोहीम राबविली. या योजनेसाठी लोकांनी आणि सामाजिक संघटनांनीही सहकार्य केले, त्यामुळे पाणी संचय होऊ लागला आहे. याचा फायदा शेतकºयांना निश्चित होईल.- दशरथ काळे, तहसीलदार खंडाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपात