शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:34 IST

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

ठळक मुद्देलोकसहभागाच्या कामाला यश -भविष्यातील चिंता मिटणारगावोगावच्या तलावांत पाणी साचू लागले

खंडाळा : तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गावोगावी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आणि परिसरातील तलावांत खडखडाट झाला होता. भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून गाळमुक्तीचे अभियान राबविण्यात आले होते. पावसाळा सुरू होताच तलाव, बंधारे यातून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे गाळमुक्तीच्या माध्यमातून जलसंचय करण्यात यश मिळाले आहे. याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असल्याने शेतकरीही समाधानी आहेत.शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शासनाच्या योजनेतून गाळ उपसण्यासाठी लागणाºया यंत्राच्या इंधनाचा खर्च काही ठिकाणी करण्यात आला होता तर अनेक गावांतून सामाजिक संघटना आणि लोकसहभागातून गाळ उपसण्यात आला. यातून शेतकऱ्यांना केवळ वाहतूक खर्चात स्वत:च्या शिवारात गाळ भरता आला. त्यामुळे माळरानाच्या मुरमाड जमिनी लागवडीखाली येण्यास मदत झाली.लोकसहभागाच्या माध्यमातून गाळमुक्तीचा हा जागर संपूर्ण तालुक्यात राबला. या मोहिमेतून तलाव, ओढे आणि छोटे बंधारे यांचे खोलीकरण होऊन लाखो लिटर पाण्याचा संचय वाढविला आहे. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी प्रत्येक कामावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांना या योजनेसाठी प्रेरित केले. जलसंधारणाच्या या कामामुळे भविष्यात होणारे फायदे याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे लोकजागृती अधिक प्रमाणात झाली. त्यामुळे या मोहिमेला बळकटी मिळाली त्यातूनच जलसंचयनाचे मोठे काम उभे राहिले. आता पावसाने याच तलावातून पाणी साचू लागल्याने भविष्यातील चिंता मिटणार आहे.सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग...गाळमुक्ती करून पाणीसाठा वाढावा, यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. यामध्ये काही लोकांनी मशिनरी, कंटेनर, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले तर काही लोकांनी वर्गणी काढून या कामाला हातभार लावला, त्यामुळे तालुक्यात हे काम यशस्वीपणे मोठ्याप्रमाणात झाले.खंडाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच यावर्षी गावोगावी पाण्याची कमतरता भासली. भविष्यात अडचणी येऊ नयेत म्हणूनच पाणी साठवण प्रमाण वाढणे गरजेचे होते. त्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, बंधारे, छोटी धरणे यातील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तालुक्यात विशेष मोहीम राबविली. या योजनेसाठी लोकांनी आणि सामाजिक संघटनांनीही सहकार्य केले, त्यामुळे पाणी संचय होऊ लागला आहे. याचा फायदा शेतकºयांना निश्चित होईल.- दशरथ काळे, तहसीलदार खंडाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपात