शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:19 IST

दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत.

- नितीन काळेलसातारा : दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. बनगरवाडीतील मेंढपाळांची तर आठ कुटुंबे दिवाळीपासून घोड्यावर संसार बांधून मराठवाड्यात आहेत. मेंढ्या जगविण्यासाठी रोज त्यांना नवे गाव शोधावे लागत आहे.माण तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती आहे. त्याचबरोबर या शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध, शेळी-मेंढीपालन व्यवसाय. आजही या तालुक्यातील अनेक गावांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायावरच त्यांचा वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी जून महिन्यानंतर पाऊस झाला की सगळीकडे आबादी आबाद असते; पण एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले की जनावरे जगविण्यासाठी घरदार सोडायची वेळ येते. या वर्षीच्या दुष्काळात माण तालुक्यातील अनेक शेतकरी, मेंढपाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी तालुकाच नव्हे तर जिल्हा सोडून गेले आहेत.माणमधील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) हे गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्या गावाची. या गावातील तरुणवर्ग पुण्या-मुंबईला नोकरीला. तर अनेकांचा मेंढीपालनाचा व्यवसाय. याच गावातील आठ कुटुंबे दुष्काळ पडल्याने गेल्यावर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढ्या जगविण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडली आहेत. पंढरपूर, बार्शी अशी गावे करत आज ही कुटुंबे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहेत. या बनगरवाडीतील अशोक बनगर, किसन बनगर, सदाशिव वाघमोडे, चंद्रकांत ढेरे, धर्मा दोलताडे, नेताजी बनगर, गणेश शिंगाडे आणि दत्तू काळे हे मेंढ्या जगविण्यासाठी बाहेर पडलेत. तसेच यांच्या घरातील माणसे मिळून १५ जण ५०० मेंढ्यासाठी झटत आहेत. चाºयाच्या शोधात सर्वांनाच दररोज नव्या गावात मुक्काम करावा लागतो. मग, ती जागा घाणीची असो किंवा काट्याकुट्यांची; पण जगायचं आणि जगवायचं हेच ठरवून घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना आता पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यातच राहावं लागणार आहे.मोबाइल चार्जिंग करायला एक जणमेंढपाळ कुटुंबीय मराठवाड्यात असली तरी गावी मुलं, आई-वडील, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी दोन-चार दिवसांतून संपर्क करावा लागतो. त्यासाठी काही जणांकडे मोबाइल आहे. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील गावात जावे लागते. सर्वांचेच मोबाइल एकाने न्यायचे व ते चार्ज करून आणायचे. तोपर्यंत इतरांना मेंढ्यांना पाणी पाजणे, वाघर लावणे, दळण, जळण गोळा करणे अशी कामे करावी लागतात. या कुटुंबाबरोबर ५०० मेंढ्या, ८ घोडी आणि ६ कुत्री आहेत. घोड्यावर कुटुंबाचा सारा संसार असतो.पाण्याचा भाग आणि जुंधळ्याची रानं म्हणून काळ्या रानात जातो. बार्शी, उस्मानाबाद, लातूरपतूर आम्ही जातू. बाभळीची झाडं असत्याती. त्याच्या शेंगा खाऊन जनावर (जित्राब) जगतं. या रानात मेंढरं जगावायची म्हणून लोकांच्या शिव्याबी खाव्या लागत्यात; पण जगायचं म्हणल्यावर राग धरून थोडाच चालतूया. आता पाऊस पडल्यावर गावाकडं. तवर काळ रानच आमचं घर.- अशोक बनगर, मेंढपाळ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ