शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:37 IST

Rain Satara- सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऊस, गहू झोपला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. दरम्यान, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात होत असणाऱ्या पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका ! पिकांचे नुकसान : ऊस अन् गहू झोपला; वीज पुरवठा खंडित

सातारा : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऊस, गहू झोपला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. दरम्यान, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात होत असणाऱ्या पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला आहे.जिल्ह्यातील वातावरण मागील तीन दिवसांपासून बदलत चालले आहे. थंडीचे प्रमाणही कमी झाले असून, किमान तापमान १६ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यातच जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर काही भागात वाऱ्यासह पावसानेही सुरुवात केली. सातारा शहरात तर बुधवारी रात्री पावणे नऊनंतर साडेदहापर्यंत पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठाही खंडित झाला. नागरिकांना जवळपास अर्धा तास अंधाराचा सामना करावा लागला. रात्री साडेदहा नंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरू झाला. सातारा शहराबरोबरच तालुक्‍यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेती पिकासाठी नुकसानकारक ठरत आहे.बुधवारी रात्री माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरत पाऊस झाला. सध्या ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीस आली आहेत. काढणीच्या काळात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. खटाव तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. या तालुक्यात फळबागा असल्याने गारा पडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.फलटण तालुक्यातील आदर्की परिसराची गुरुवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या गारा पडल्या. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तसेच आदर्की परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर, पिंपोडे, सोनके, रणदुल्लाबाद या परिसरातही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चांगला पाऊस झाला. जवळपास एक तास पाऊस पडला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अवकाळी पावसाचा काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभऱ्याला फटका बसणार आहे.कऱ्हाड तालक्यातील मलकापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गहू, ऊस, शाळू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील कापिल, जखिनवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात जोराच्या वाऱ्यामुळे वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले आहेत. काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.ऊसतोडीवर परिणाम होणार...जिल्ह्यात बुधवारपासून कोठे ना कोठे पाऊस होत आहे. त्यातच सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ऊसतोड वेगाने सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्याने ऊसतोडीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. कारण, जमिनीत पाणी साचणे, रस्ता निसरडा होण्याने वाहन घेऊन जाणे अवघड होऊन बसणार आहे.सातारा शहरात दुसऱ्या दिवशीही हजेरी...सातारा शहरात बुधवारी रात्री पाऊस झाला. ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर