शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

By नितीन काळेल | Published: April 22, 2024 7:01 PM

सर्वत्र पाणीच पाणी

सातारा : जिल्ह्यात पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या आहेत. सातारा शहरासह बहुतांशी भागातील कमाल तापमान हे ४० अंशादरम्यान राहत आहे. यामुळे दिवसा कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाड्याने बैचेन होण्याची वेळ आलेली आहे. तसेच कडाक्याच्या उन्हाने शेती, बाजारपेठेवरही मोठा परिणाम झालेला आहे. या उन्हापासून सुटका होण्यासाठी नागरिक दुपारच्या सुमारास घरी किंवा झाडाच्या सावलीत बसत आहेत. घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. अशातच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण होत असल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास जावळी तालुक्यातील आनेवाडी परिसरात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वाई तालुक्यातील विरमाडे, पाचवड या भागात पाऊस पडला. वाऱ्यासह हा पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. तर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरुन धावणारी वाहने लाईट लाऊन जात होती. जवळपास १० मिनीटे पाऊस पडला. पण, यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्याचबरोबर वाई तालुक्यातील भुईंज परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अन्य काही ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस