शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून दुष्काळ निवारणाचे अनोखे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:10 IST

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी,

ठळक मुद्देभोसले महाराजांचा उपक्रम : माण तालुक्यातही छावणीवर कीर्तन सेवेला सर्व स्तरातून मिळतोय प्रतिसाद

दहिवडी : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, भरपूर शेतउत्पन्न व्हावं याकरिता अनेक संघटना कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे संतसाहित्याच्या आधारे लोकांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

काम महाएनजीओ फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच यांनीही सुरू केले आहे. वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक अक्षय महाराज भोसले यांच्या विचारांतून या उपक्रमाला चालना मिळाली आहे. महाराजाच्या गावात कधीच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या गावातील दुष्काळ माझ्या जन्मापासूनच अनुभवला आहे. वृक्ष आणि जलसंवर्धन होत नाही, तोवर दुष्काळ महाराष्ट्रातून जाणार नाही, असं अभ्यासाअंती सिद्ध झालं. कीर्तनाचे धडे ज्यांच्याकडे गिरवले त्या श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर व श्रीगुरू प्रमोदमहाराज जगताप यांनी याविषयी जाणीव करून देण्यात आलीे.

दरम्यान, पाणी फाउंडेशनचं काम उभं राहिलं. या कामाचं यशही पाहिलं. म्हणूनच आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष, जलसंवर्धनाचे प्रबोधन करायचे ठरवले. राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, आर्ट आॅफ लिव्हिंगचे महाराष्ट्रचे सल्लागार शेखर मुंदडा यांचीही भेट घडून आली. दोघांचेही या क्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.समाजप्रबोधनाचं काम महाराष्ट्रात सुरूसोशल मीडियाच्या माध्यमातून रोज या संदर्भातील अभ्यासपूर्ण पोस्ट्स जवळपास १०,००० हून अधिक लोकांपर्यंत नियमित पोहोचल्या जातात. आतापर्यंत सोलापूर, सातारा, बीडमधील ३० हून अधिक छावण्यापर्यंत व बिजवडी, राजवडी, अनभुलेवाडी, मोगराळे, पाचवड, वावरहिरे येथे समाजप्रबोधनाचं काम झाल्याचं अक्षय महाराज यांनी सांगितले. या संत वचनाप्रमाणे आपणही जलाशयाची निर्मिती केली असती, विविध प्रकारची महावने लावली असती तर दुष्काळाचे संकट ओढवले नसते. संतसाहित्याचा जनमाणसांत हवा तेव्हा प्रसार न झाल्यानेच ही परिस्थितीत ओढावल्याची खंत त्यांनी व्यक्त करतात.हा उपक्रम अत्यंत गरजेचे आहे. यामधून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांत जागृती निर्माण होत आहे.- आप्पा कोरे, ग्रामस्थ, सातारासध्या महाराष्ट्रसह माण तालुका दुष्काळाच्या खाईत अडकला आहे. त्याठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आला असून, यामध्ये दुष्काळावर कीर्तन करणे हे समाज हिताचे आहे.- श्वेता जंगम, ग्रामस्थ, सातारा

टॅग्स :SocialसामाजिकSatara areaसातारा परिसर