शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बेरोजगारी, कर्जबाजारीपणा अन् दुष्काळ दहा तोंडी रावणासारखे - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:40 AM

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे.’

ठळक मुद्दे। रहिमतपूर येथे महायुतीच्या उमेदवारांची प्रचारसभा

रहिमतपूर : ‘बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहा तोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आड येणाऱ्या दहातोंडे रावणाचा वध करीत पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल,’ असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे क-हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे.’यावेळी उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, नितीन बानगुडे-पाटील, कांताताई नलवडे, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, अ‍ॅड. विशाल शेजवळ, नगरसेविका रुक्मिणी सुतार, चित्रा महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भीमराव पाटील, सुनीता कदम, पंचायत समितीच्या सदस्या विजया गुरव, रवींद्र भोसले, पक्षनेते रामकृष्ण वेताळ, संपतराव माने व ग्रामस्थ उपस्थित होते.रहिमतपूर येथे शनिवारी झालेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, नितीन बानगुडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना