शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

घरातीलच सोहळा समजून पालखी सोहळा पार पाडा-अस्मिता मोरे- लोणंदमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 20:28 IST

‘लोणंदमधील सर्व नागरिक, नगरसेवक व शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरातीलच सोहळा आहे, असे समजून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,’

लोणंद : ‘लोणंदमधील सर्व नागरिक, नगरसेवक व शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरातीलच सोहळा आहे, असे समजून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन वाईच्या उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले.

 

लोणंद येथे नगरपंचायत सभागृहात शुक्रवारी आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार विवेक जाधव, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, हणमंतराव शेळके-पाटील, गटनेते योगेश क्षीरसागर, नगरसेविका कुसुम शिरतोडे, बांधकाम विभाग, वीज वितरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मोरे म्हणाल्या, ‘लोणंद येथील पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सर्वच यंत्रणांनी स्वयंस्फूर्तीने काम केले पाहिजे. या सोहळ्यात येणाºया वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोहळा आनंदीमय वातावरणात पार पडेल. या सोहळ्यात कोणत्याही प्रशासकीय कर्मचाºयाने कामाच्या बाबतीत हयगय केल्यास त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.’

तहसीलदार जाधव म्हणाले, ‘पालखीतळावर दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यासाठी भाविकांना यावेळी स्वतंत्र रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना अडचणी येणार नाहीत. दहा ठिकाणी साडेसहाशे फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत भाविकांना सुविधा देण्यात येणार आहेत. प्रकाशासाठी पालखी तळावर हायमास लाईटची व्यवस्था, तीन पर्यायी बस डेपोची व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करून एक आदर्श पालखी सोहळा पार पाडण्यात येणार आहे.’

दिघावकर म्हणाले, ‘लोणंद येथे कोणत्याही ठिकाणी गर्दी, अपघात होणार नाहीत याचे संपूर्ण नियोजन केले आहे. लोणंदमधील रस्ते अरुंद असून अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे.’पालखीतळाच्या सपाटीकरण तसेच गावातील रस्ते, रस्त्याच्या कडेची वाढलेली बाभळीची झुडपे काढणे, चिखल होतो तेथे मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगितले.मागील वर्षी खेमावती नदीला आलेल्या पुरात तीनजणांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पालखी पूर्वी खेमावती नदी स्वच्छ करावी.- हणमंतराव शेळके-पाटील नगरसेवक

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी