शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

By संजय पाटील | Updated: April 18, 2023 14:06 IST

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते

संजय पाटीलकऱ्हाड : महाराष्ट्राची वरदायीनी असलेल्या कोयना नदीचा काठ सध्या पोखरला जातोय. पाटणपासून कऱ्हाडपर्यंत ठिकठीकाणी नदीकाठावर जेसीबी नाचवले जातायत. काहीजण परवाने घेऊन तर काही विनापरवानाच मातीचे बेसुमार उत्खनन करतायत. मातीसम्राटांनी मोठमोठे खड्डे खोदले असून काही ठिकाणी नदीकाठचे कडेही जमिनदोस्त करण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्र बदलले आहे, विस्तीर्ण झाले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली कोयना नदी दक्षिणेला वाहत जाऊन हेळवाक गावाजवळ पूर्व वाहिनी होते. कृष्णा नदीची ही सर्वात मोठी उपनदी आहे. तसेच कोयनेच्याही काही उपनद्या आहेत. याच कोयनेवर शिवसागर जलाशय असून कोयना धरणाची निर्मितीही करण्यात आली आहे. धरणापासून पुढे वाहत जाणाºया नदीपात्रात अनेक सिंचन योजना आहेत. तसेच निसरे व तांबवे येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. कोयनेच्या पाण्यावर लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले असून धरणाच्या माध्यमातून राज्य प्रकाशमान झाले आहे.कोयनेतील पाण्याच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न झालेले असतानाच अनेकांनी लाल मातीत स्वत:चे उखळही पांढरे करुन घेतले आहे. नदीकाठावर असणाºया लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्यामुळे ठिकठीकाणी नदीपात्र बदलले आहे. विस्तिर्ण झाले आहे. त्याबरोबरच नदीकाठची शेतीही केवळ कागदावर उरली असून अनेक मळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत.

उगम ते प्रीतीसंगम१२५ : किलोमिटर अंतर

कोयनेच्या उपनद्यासोळशी - तापोळाकाजळी - संगमनगरकाफना - हेळवाककेरा - पाटणमोरणा - बेलवडेवांग - येरवळे

माती उत्खननाचे दुष्परीणाम

  • नदीकाठाची मोठ्या प्रमाणावर धूप
  • ठिकठीकाणी नदीकाठ खचला
  • खड्डे खोदल्यामुळे पाणी साचून राहिले
  • नदीकाठची शेती वाहून गेली
  • उत्खनन झालेल्या दिशेने नदीपात्र बदलले
  • नदीकाठावरील जुन्या झाडांची कत्तल
  • प्राणी, पक्ष्यांचे अधिवास नष्ट

२४ - नदीकाठची महत्वाची गावे

माती उत्खनन परवाने४३ : पाटण तालुका६१ : कऱ्हाड तालुका

जमिन गायब; उरला सातबाराकऱ्हाड तालुक्यात सुपने गावापासून वारुंजीपर्यंत काही ठिकाणी लाल मातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे की, नदीपात्र बदलून नदीकाठची जमिनच गायब झाली आहे. शेतकऱ्यांकडे केवळ त्या जमिनीचा सातबाराच शिल्लक राहिला आहे. आपली जमिन शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

नदीकाठ उद्ध्वस्त; रस्त्यांची दुर्दशालाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते. त्यातच मातीच्या वाहतुकीमुळे गावागावातील पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. माती वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे हे रस्ते शेतकऱ्यांसाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी