शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

By संजय पाटील | Updated: April 18, 2023 14:06 IST

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते

संजय पाटीलकऱ्हाड : महाराष्ट्राची वरदायीनी असलेल्या कोयना नदीचा काठ सध्या पोखरला जातोय. पाटणपासून कऱ्हाडपर्यंत ठिकठीकाणी नदीकाठावर जेसीबी नाचवले जातायत. काहीजण परवाने घेऊन तर काही विनापरवानाच मातीचे बेसुमार उत्खनन करतायत. मातीसम्राटांनी मोठमोठे खड्डे खोदले असून काही ठिकाणी नदीकाठचे कडेही जमिनदोस्त करण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्र बदलले आहे, विस्तीर्ण झाले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली कोयना नदी दक्षिणेला वाहत जाऊन हेळवाक गावाजवळ पूर्व वाहिनी होते. कृष्णा नदीची ही सर्वात मोठी उपनदी आहे. तसेच कोयनेच्याही काही उपनद्या आहेत. याच कोयनेवर शिवसागर जलाशय असून कोयना धरणाची निर्मितीही करण्यात आली आहे. धरणापासून पुढे वाहत जाणाºया नदीपात्रात अनेक सिंचन योजना आहेत. तसेच निसरे व तांबवे येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. कोयनेच्या पाण्यावर लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले असून धरणाच्या माध्यमातून राज्य प्रकाशमान झाले आहे.कोयनेतील पाण्याच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न झालेले असतानाच अनेकांनी लाल मातीत स्वत:चे उखळही पांढरे करुन घेतले आहे. नदीकाठावर असणाºया लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्यामुळे ठिकठीकाणी नदीपात्र बदलले आहे. विस्तिर्ण झाले आहे. त्याबरोबरच नदीकाठची शेतीही केवळ कागदावर उरली असून अनेक मळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत.

उगम ते प्रीतीसंगम१२५ : किलोमिटर अंतर

कोयनेच्या उपनद्यासोळशी - तापोळाकाजळी - संगमनगरकाफना - हेळवाककेरा - पाटणमोरणा - बेलवडेवांग - येरवळे

माती उत्खननाचे दुष्परीणाम

  • नदीकाठाची मोठ्या प्रमाणावर धूप
  • ठिकठीकाणी नदीकाठ खचला
  • खड्डे खोदल्यामुळे पाणी साचून राहिले
  • नदीकाठची शेती वाहून गेली
  • उत्खनन झालेल्या दिशेने नदीपात्र बदलले
  • नदीकाठावरील जुन्या झाडांची कत्तल
  • प्राणी, पक्ष्यांचे अधिवास नष्ट

२४ - नदीकाठची महत्वाची गावे

माती उत्खनन परवाने४३ : पाटण तालुका६१ : कऱ्हाड तालुका

जमिन गायब; उरला सातबाराकऱ्हाड तालुक्यात सुपने गावापासून वारुंजीपर्यंत काही ठिकाणी लाल मातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे की, नदीपात्र बदलून नदीकाठची जमिनच गायब झाली आहे. शेतकऱ्यांकडे केवळ त्या जमिनीचा सातबाराच शिल्लक राहिला आहे. आपली जमिन शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

नदीकाठ उद्ध्वस्त; रस्त्यांची दुर्दशालाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते. त्यातच मातीच्या वाहतुकीमुळे गावागावातील पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. माती वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे हे रस्ते शेतकऱ्यांसाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी