शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खंबाटकी घाटातील ‘एस’ वळणावर दुचाकी घसरून तरुण-तरुणी ठार; दिवसभरात पाच अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 11:58 IST

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी

शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील ‘एस’ वळणावर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच रात्री आठच्या सुमारास एक दुचाकी घसरली. त्यानंतर दुचाकीवरील तरुण-तरुणी मालट्रक खाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेशोत्सव अन् त्याला जोडूनच शनिवार, रविवार सुट्या जोडून आल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. या परिसरात तब्बल सोळा तासांपासून वाहने ठप्प आहेत. कित्येक वेळ गाड्या जागेवर सुरू असल्याने गरम होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बॉनेट उघडून वाहने उभी आहेत.दरम्यान, दुचाकी (एमएच १४ केव्ही ३८८४) वरून २४ वर्षीय तरुण अन् २२ वर्षीय तरुणी साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. खंबाटकी घाटातील एस वळणावर ते दोघे आले असता त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे ते दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येत असलेल्या मालट्रक (केए ६७ ९९९८)च्या खाली ते आले. त्यांच्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक श्रीसुंदर वंदना, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजीव आहेरराव तसेच भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली.

दिवसभरात पाच अपघातखंडाळा तालुक्यात महामार्गावर रविवारी दिवसभरात पाच विविध अपघात झाले. यामध्ये ‘एस’ वळणावर दुपारी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. रात्री दुचाकी घसरल्याने अपघात झाला. एका हॉटेलसमोर ट्रकने पादचाऱ्याला उडविले, तर धनगरवाडी हद्दीत दुचाकीचा अपघात झाला. या सर्व अपघातांत दोन ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू