शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलांची घरवापसी, सातारा पोलिसांनी केले पालकांकडे सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 8:33 PM

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी

ठळक मुद्देविविध कारणांनी सोडले होते घर :पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात.

गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन घरवापसी केली आहे.

शहरी वातावरणाचे आकर्षण, टीव्ही, चित्रपट, मालिकांचा प्रभाव याचा सामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलांमुलींवर परिणाम होत आहे. प्रेमप्रकरण, घरचा वाद, पालकांची अवास्तव भीती यामुळे आणि इतरही क्षुल्लक कारणांमुळं मुलं घर सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यात विशेषत: अल्पवयीन मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. गत तीन महिन्यांत सातारा बसस्थानक पोलिसांनी आढळून आलेल्या पाच मुलांना तर तीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही सर्व मुले सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील असल्याचे दिसून आले आहे.

क्षुल्लक कारणापोटी ही मुले घर सोडतात, शहरात येतात आणि पैसे संपले की वणवण भटकतात, त्यांच्या या असा' अवस्थेचा मग काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. बसस्थानक परिसरात फिरणारे असामाजिक घटक खेडोपाड्यातून आलेल्या गरीब मुलांना हेरून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे बालपण हिरावून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सातारा बसस्थानक पोलिस चौकीतील हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

दोन महिन्यांत तब्बल आठ मुलं बसस्थानकात सापडली. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून आलेली मुलगी तर काही मुलं घरातील भांडणामुळे घराबाहेर पडली होती. साधारणत: घरातून पळून आलेली मुलं गणवेशातील पोलिसांना पाहून घाबरतात आणि पळून जातात. तर काही मुले रडायला लागतात. त्यांच्याकडील पैसे संपलेले असतात, त्यांना चूक कळलेली असते. घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत हवी असते. भरकटलेल्या अशा मुलांना सातारा बसस्थानक पोलिसांनी वेळीच पालकांच्या स्वाधीन केल्याने खºया अर्थाने त्यांची घरवापसी झाली आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSatara areaसातारा परिसर