शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
3
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
4
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
5
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
6
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
7
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
8
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
9
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
10
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
11
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
13
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
14
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
15
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
16
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
17
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
18
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
19
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
20
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय

सातारा जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री निश्चित; शिंदेसेनेचे ठरलं, भाजपमध्ये स्पर्धा, राष्ट्रवादीचे पत्ते बंद

By नितीन काळेल | Updated: December 5, 2024 13:51 IST

.. तर दुष्काळी भागाला पहिल्यांदा मंत्रिपद

नितीन काळेलसातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी गुरुवारी मंत्रिमंडळ स्थापन होत असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचाही नंबर लागणार आहे. यामध्ये किमान दाेघांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई यांचे नाव निश्चित असून, भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात स्पर्धा आहे, तर राष्ट्रवादीचे पत्ते अजूनही पूर्णपणे उघड झालेले नाहीत.विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा धुरळा उडवताना महायुतीने सर्वच आठही मतदारसंघात झेंडा फडकवला. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक चार, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. निवडणुकीनंतर १२ दिवसांनी गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. तसेच मंत्रिमंडळाचीही स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सावलीसारखे उभे राहणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना यावेळीही मंत्रिपदाची संधी आहे. त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जाते. पण, भाजपमध्ये सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माणचे जयकुमार गोरे यांच्यात मंत्रिपदावरून चुरस आहे. तरीही शिवेंद्रसिंहराजेंचेच पारडे जड वाटत आहे. सातारा - जावळीत स्वत:चा हुकमी गट तसेच त्यांच्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनीही गाठीभेटी घेतल्या आहेत. असे असले तरीही कामाची पध्दत, जिल्ह्यातील गट, पक्षासाठी होणार फायदा याचा विचार केल्यास जयकुमार गोरेंना मंत्रिपदाचे दार उघडे होऊ शकते. शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद मिळाले तर त्यांना पक्षवाढीसाठी जिल्ह्यात वावर वाढवावा लागणार आहे. त्यामुळे भाजप नेतृत्व दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे मंत्रिमंडळ स्थापनेवेळीच समोर येणार आहे.

मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत अनिश्चितता..राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही सर्व गुपचूप आहे. सर्व पत्ते ओपन झालेले नाहीत. त्यातच पक्षाच्या वाट्याला ८ ते १० मंत्रिपदे येणार आहेत. त्यामुळे कोणाकोणाला मंत्री करायचे, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आहे. विभागांचा विचार करून आणि मातब्बरांना मंत्रिपदावर ठेवूनच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वाईचे आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादीकडून दावेदार असलेतरी मंत्रिपदाबाबत अनिश्चितता आहे. तरीही अजित पवार यांच्याबरोबरचे संबंध पाहता मकरंद पाटील यांनाही लाॅटरी लागू शकते. पण, हा जर-तरचा राजकीय खेळ राहणार आहे.

.. तर दुष्काळी भागाला पहिल्यांदा मंत्रिपदजिल्ह्यात सध्या आठ मतदारसंघ आहेत. यामधील सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर, पाटण या मतदारसंघातील आमदारांना आतापर्यंत मंत्रिपद कधी ना कधी मिळालेले आहे. पण, माण मतदारसंघाला मंत्रिपदाची हुलकावणीच राहिलेली आहे. जयकुमार गोरे यांचे भाजपमधील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे याचा फायदा जयकुमार यांना होऊ शकतो. जयकुमार यांना लाल दिवा मिळाल्यास दुष्काळी भागाला प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे.

पित्यानंतर पुत्र मंत्री होणार ?सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे करत आहेत. शिवेंद्रसिंहराजेंचे वडील अभयसिंहराजे भोसले यांनीही अनेक वर्षे मतदारसंघाचे एकहाती नेतृत्व केले. अभयसिंहराजे हे सहकारमंत्रीही होते. आता शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पित्यानंतर पुत्रही मंत्री होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराministerमंत्रीShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेJaykumar Goreजयकुमार गोरेShambhuraj Desaiशंभूराज देसाईMakarand Patilमकरंद पाटील