शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

हळद रुसली; व्यापारी हसले : पिवळं सोनं स्वस्त उत्पादक शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:07 IST

संतोष खांबे ।वडगाव हवेली : आवक वाढीचे कारण सांगत शेतकºयांचा शेतीमाल कवडीमोल दराने घेऊन त्याचा व्यापार करणारी मंडळीच आज मालक बनली असून, यामधून शेतकºयांची पिळवणूक होत आहे. काहीवेळा उत्पादनावरील खर्चापेक्षा मिळणारा नफाच कमी असतो. असाच काहीसा प्रकार हळद या पिकाबाबत होत असून, हळदीचे माहेरघर असणाºया वडगाव हवेली, ता. कºहाड परिसरातील ...

ठळक मुद्देदराचा आकडा व्यापाऱ्यांच्या हाती

संतोष खांबे ।वडगाव हवेली : आवक वाढीचे कारण सांगत शेतकºयांचा शेतीमाल कवडीमोल दराने घेऊन त्याचा व्यापार करणारी मंडळीच आज मालक बनली असून, यामधून शेतकºयांची पिळवणूक होत आहे. काहीवेळा उत्पादनावरील खर्चापेक्षा मिळणारा नफाच कमी असतो. असाच काहीसा प्रकार हळद या पिकाबाबत होत असून, हळदीचे माहेरघर असणाºया वडगाव हवेली, ता. कºहाड परिसरातील शेतकरी कमी दरामुळे अस्थस्थ झाले आहेत.

जिल्ह्यात कºहाड व वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हळद पिकाची लागवड होते. कºहाडमध्ये वडगाव हवेली परिसरात ३०० ते ४०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड होते. हे पीक किमान ९ ते १० महिन्यांचे असून, त्याची लागण मे ते जूनदरम्यान होते. तर काढणी जानेवारी ते मार्चदरम्यान होते.लागणीनंतर वेळेवर पाणी देणे, औषध फवारणी, खताची मात्रा वेळेवर देणे गरजेचे असते.जानेवारी ते मार्च या कालावधीत हळदीच्या काढणीची लगबग चालू होते. काढणीनंतर हळद शिजवणे, वाळविणे, पॉलिश करणे आदी करून बाजारपेठेत जाण्यायोग्य हळद तयार होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जातो. यावेळी शेतकरी डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतो.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची उलाढाल सांगली बाजारपेठेत होते. या परिसरातील सर्व माल येथेच विक्रीसाठी जातो. हळदीचा व्यवसाय हा पूर्णत: व्यापारी वर्गाच्या हातात असून, ते ठरवतील तोच दर शेतकºयाला मान्य करावा लागतो. व्यापारी आपल्या मनाने मालाची प्रत ठरवून त्यांना हवी तशी सोयीस्कर किंमत करून माल घेतात. परंतु ही प्रत कोणत्या निकषाने ठरवली जाते, याचा उत्पादक शेतकºयाला अजूनही शोध लागलेला नाही.

याबरोबरच काही वर्षांपूर्वी शंभर किलो वजनाची पोती असायची. परंतु काही वर्षांपासून व्यापाºयांच्या नियमांनुसार ५० किलोची गोणी भरणे बंधनकारक झाले. मात्र, त्या गोणीवर असणारे हमाली, तोलाई, दलाली व तूट याचे दर कायमच राहिले म्हणजे एकूणच शेतकºयांच्या नुकसानीत भरच पडत गेली. शेतकºयांना लिलाव पद्धतीमधील अंदाज नसल्याने व्यापारी मनमानी करून लिलाव करीत असतात. गत महिन्याच्या कालावधीत एका महिन्यात दरामध्ये ४ ते ५ हजारांचा चढ-उतार कशामुळे झाला. मात्र, तो का झाला, याबाबत शेतकºयांना कसलीच कल्पना नाही.

हळद बाजारपेठेत आणून त्याचा लिलाव होऊन विक्री झाली तरी शेतकºयाला मात्र त्याचे पैसे एक ते दीड महिन्यांनी हातात मिळतात. तेही पूर्वीच्या काळात रोख पैसे दिले जायचे. मात्र, सध्या धनादेश देऊन शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट केली जाते.नवनवीन प्रक्रिया उद्योगांची गरजहळद उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकºयांनी नवनवीन प्रयोग आत्मसात करावयाची गरज आहे. हळदीवर प्रक्रिया उद्योगासाठी शासनस्तरावर हवे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. शेतकºयांनाही यासाठी प्रक्रिया उद्योग जोखमीचे वाटत असल्याने शेतकरी तिकडे वळत नाहीत. हळदीची निर्यात झाल्यास व प्रक्रिया उद्योगास चालना मिळाल्यास शेतकºयांना आर्थिक लाभ होईल.खर्च जास्त; नफा अल्पहळद पिकासाठी उत्पादनाच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाणही तितकेच असते. त्यामध्ये लागणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, खते, आंतरमशागत, औषध फवारणी व सर्वात महत्त्वाचा टप्पा काढणी, शिजवणे, वाळविणे व पॉलिश करणे आदींसाठी शेतकºयाला आर्थिक तडजोड करावी लागते. सर्व खर्च वजा जाता शेतकºयाला मिळणारा नफा हा अल्प प्रमाणात होतो. तर काहीवेळा दराची घसरण झाल्यास नफा होतही नाही. अशावेळी हळद पीक शेतकºयांसाठी जुगार असल्याचे व तो जुगार हरल्याचे दु:ख त्याला होते. यामुळे पूर्वपार कर्जाच्या छायेत असणारा शेतकरी अधिकच कर्जात अडकला जातो.हळद हे पीक पावसावर अवलंबून असते. ज्यावेळी हळद लागवड क्षेत्रात वाढ होईल, त्यावेळी साहजिकच उत्पादनातही वाढ होते. मात्र, यावेळी आवक वाढल्याने दराची घसरण होते. अशावेळी हळद साठविण्यासाठी स्वतंत्र स्टोरेज उपलब्ध नसल्यामुळे कवडीमोल दराने शेतकºयाला आपला माल विकावा लागतो.याकरिता हळद साठविण्यासाठी स्वतंत्र गोदाम होण्याची गरज असून, बाजारभाव कोसळल्यावर आर्थिक झळ बसत असते. तेजी येईपर्यंत गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी स्टोरेजमधील मालावर शेतमाल तारण योजनेसाठी विचार व्हावा व शासनदरबारी यासाठी प्रयत्न होणेची गरज आहे.