शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:49 IST

सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली. त्यातच पावसाने या महामार्गाची चाळण केली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे प्रशासनावर वाढतोय दबाव

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : खिळखिळ्या राष्ट्रीय महामार्गामुळे मेटाकुटीस आलेल्या सातारा जिल्ह्यातील नेटकऱ्यांनी नेटाने चालवलेले टोलविरोधी आंदोलन निर्णयात्मक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे आंदोलनाचे बळ वाढले आहे. आंदोलनाच्या या टप्प्यात जिल्ह्यातील उर्वरित लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन टोलला अखेरचा टोला द्यावा, अशी अपेक्षा जिल्ह्याच्या भूमिपुत्रांकडून व्यक्त होत आहे.

चौपदरीकरणाच्या सुरुवातीच्या काही वर्षांनंतर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा-पुणे दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाली. सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली. त्यातच पावसाने या महामार्गाची चाळण केली.

प्रवासाचा वाढलेला वेळ, अपघातांची वाढती संख्या, वाहनांचे होणारे नुकसान तसेच माणसाची होणारी शारीरिक झीज, मानसिक त्रास यामुळे सातारकर पेटून उठले. ‘टोलविरोधी सातारी जनता’ या नावाने व्यापक जनआंदोलन उभे राहिले. विशेष म्हणजे हे आंदोलन समाज माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे केवळ सातारा शहरच नव्हे तर राज्य आणि देशभर विखुरलेल्या सातारच्या भुमिपुत्रांची ताकद समाज माध्यमावर एकवटली.

‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडून पाठपुरावा सुरूकेला. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज माध्यमातून सुरू झालेली ही जनजागृतीची चळवळ अल्पावधीतच बाळसं धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आता थेट केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत सातारकरांनी धडक मारली.

केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्याने जिल्हावासीयांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. असे असले तरी केंद्र व भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण या मार्गाचे ठोस काम करत नाहीत, तोपर्यंत जनता टोल भरणार नाही, या भूमिकेवर जिल्हावासीय ठाम आहेत.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग केवळ सातारा-जावळी तालुक्यातून जात नाही. त्यामुळे वाई, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी टोल व या रस्त्यावरील गैरसोयींबाबत भूमिका घ्यावी. या खराब रस्त्याचा त्रास फक्त सातारकरांबरोबरच जिल्हावासीयांना बसत आहे. टोलविरोधी आंदोलन ही एक व्यापक अराजकीय चळवळ आहे. सातारकर आणि पुणे यांचे जवळचे नाते आहेत. असंख्य सातारकर दररोज पुण्याला ये-जा करतात. त्यामुळे हे आंदोलन सर्वांचे सर्वांसाठी मोलाचे आहे. निमंत्रणाची वाट न पाहता एक नागरिक म्हणून चळवळीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा ‘टोलविरोधी सातारी जनता’ चळवळीतर्फे केली जात आहे.

निवडणुकीतील उमेदवार गेले कोठे?विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्णात साठहून अधिक उमेदवार रिंगणात होते. मतदारांच्या प्रश्नांबाबत सर्वांनाच पुळका आला होता. त्यांच्या भाषणांतून तो दिसत होता. टोलविरोधी सातारी जनता हे आंदोलन सुरू झाल्यानंतर ही मंडळी कोठे गेली?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उमेदवारांनी तरी किमान या आंदोलनाला प्रसिद्धीपत्रक काढून पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग