शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:50 IST

जिल्ह्यात दडपशाही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही - मकरंद पाटील

वरकुटे-मलवडी : ‘कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटवण्याची धमक अन् दुष्काळाशी लढण्याचं बळं माणच्या मातीत आहे. दुष्काळी भागासाठी शेतशिवारात पाणी आणल्याशिवाय या भागचा विकास खऱ्या अर्थाने होणार नाही. उगीच कुणाची उणी धुणी काढण्यापेक्षा काम करणं महत्वाचं आहे. माझ्या बारामतीसारखं माण खटाव भागही शेतीसाठी पुढे गेला पाहिजे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.दहिवडी येथील बाजार पटांगणावर रविवारी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, उदयसिंह पाटील, सुभाष नरळे, प्रतापराव पवार, वाई बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, रमेश गायकवाड, पृथ्वीराज गोडसे, संजय देसाई, जितेंद्र पवार, सीमाताई जाधव, श्रीराम पाटील, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, बाबू सूर्यवंशी, सुवर्णा देसाई, बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘माण खटाव तालुक्याचे युवा नेतृत्व म्हणून अनिल देसाई यांची जिल्हाभर ओळख आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ते अनेक वर्षे तालुक्यांचे नेतृत्व करत आहेत. सहकार, सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला बळकटी देण्याचे कार्य त्यांच्या हातून निश्चित होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामुख्याने काम करा. दुष्काळ, क्रीडा, उद्योग, शेती, पत्रकारिता यासाठी लढण्याचा गुण या मातीत आहे. त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. या भागात एमआयडीसी निर्माण झाली तर दुष्काळी भाग सावरू शकेल. रस्ते धरणं करत विकास साधला पाहिजे. चांगले रस्ते झाले तर आजूबाजूला व्यवसाय वाढतील इतर जागेला किंमत येईल.’अनिल देसाई म्हणाले, ‘माण, खटावचा दुष्काळी भागात पहिल्यांदा टेंभूचे पाणी आणण्याचे काम केले. त्यासाठी सोळा गावाचं सोळा दिवस आंदोलन मी दहिवडी तहसील कार्यालयासमोर केले. अर्थमंत्री म्हणून उर्वरित कामासाठी अजित पवार यांनी निधी द्यावा. इथलं प्रशासन सवतीसारखं वागत आहे. माणपूर्व भागात टेंभूचं पाणी आणण्यासाठी सोळा दिवस आंदोलन करून पाणी मिळवून देणारा कार्यकर्ता आहे. टेंभूचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिंगणापूर भागात अजूनही पाण्याची मागणी आहे ती पूर्ण करावी. टेंभूचे काम अपूर्णच आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. यावेळी बाळासाहेब सोळस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. महेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले.तुम्ही किती मताने निवडून येता जनतेला माहीत : मकरंद पाटील‘जिल्ह्यात दडपशाही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. दडपशाही हुकूमशाही चालू देणार नाही. तुम्ही किती मताने निवडून येता हे जनतेला माहीत आहे परंतु मकरंद पाटील मोठ्या फरकाने निवडून येतात. याला कारण प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. या भागात काही प्रमाणावर पाणी आलं असलं तरी येथील जनता प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जगत आहे. संघर्ष कसा करायचा ते या मातीतल्या माणसाला चांगलंच माहीत आहे,’ असे मंत्री मकरंद पाटील म्हणाले.