शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:50 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी धुवाधार पाऊस झाल्याने यंदा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील कोयना, धोम, तारळी, कण्हेर ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी धुवाधार पाऊस झाल्याने यंदा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील कोयना, धोम, तारळी, कण्हेर उरमोडीसह सहा प्रमुख धरणांत सुमारे १०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणातही ७७ टीएमसीवर पाणी आहे. यामुळे यावर्षी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी स्थिती आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. दरवर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यास धरणे भरतात. त्यामुळे पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत चिंता नसते. कारण, या धरणांवर पिण्याच्या आणि सिंचन पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यातच गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच मोठी धरणे भरून वाहत होती. त्यातच ऑक्टोबरमध्येही पाऊस झाल्याने जिल्ह्यातच सर्वत्र पाणी उपलब्ध झालेले. परिणामी यावर्षी अजूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा चांगलाच शिल्लक आहे.जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. २०२३ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने धरण भरले नव्हते. पण, गेल्यावर्षी धरण ओव्हरफ्लो झाले. या धरणात सध्या ७७.६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच इतर बहुतांशी धरणांतही मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नाही, अशी स्थिती आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही छोटी-मोठी धरणे आहेत. या प्रकल्पातही पाणीसाठा चांगलाच शिल्लक आहे.

मागील वर्षी ८८ टीएमसीवर साठा..जिल्ह्यात मागील वर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत प्रमुख सहा धरणांत ८७.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यामध्ये उरमोडी आणि कण्हेर धरणांत केवळ ३९ टक्के साठा होता. तर कोयना धरणात ६३ टक्के, धोममध्ये ५८ टक्के साठा उपलब्ध होता.

कोयनेतून २,१०० क्युसेक विसर्ग..जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरूच आहे. कोयना धरणात २ हजार १००, धोममधून १ हजार ३२५, कण्हेर धरणातून ४३५, बलकवडी ३४०, तारळीतून २२० आणि उरमोडी धरणातून ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)धरण  - सध्याचा साठा  - टक्केवारी  - एकूण क्षमताकोयना  - ७७.६४  - ७२.४०  - १०५.२५धोम - ९.०८  - ६३.९० - १३.५०बलकवडी २.५३ - ६०.८० - ४.०८कण्हेर ७.३५ - ७१.२८ - १०.१०उरमोडी ७.७५  - ७७.१४  - ९.९६तारळी ३.४६  - ५९.११ - ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणी