शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर--संताप आणि किरकोळ कारणातून आयुष्य संपवण्याचा मार्ग-- तरूणाईची मानसिकता =आत्महत्येची कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:16 PM

सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे.

ठळक मुद्दे गळफास घेणेविषप्राशन करणे

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे. ‘आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर,’ अगदी अशीच मानसिकता तरुणाईची दिसत आहे.हातात आलेल्या आधुनिक गॅझेटस्मुळे तरुणाईने दुनिया मुठ्ठीमे केली; पण वास्तविक ही दुनिया त्यांच्या मुठीतून दूर गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून त्यांनी ‘कायमची सुटका हवी’ म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे पसंत करत आहेत. स्पर्धेच्या युगात स्वत:शीच लढत राहणाºया या विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाला आहे. आॅनलाईन विश्वात रमणाºयांना विविध माध्यमातून ‘लाईक’ करणारे अनेकजण आहेत. मात्र, चेहºयावरील हावभाव आणि वर्तन बदलूनही कोणी काय झालं? हे विचारात नाही, याचे शल्य तरुणाईला बोचणारे आहे. कॉलेजमध्ये असलेला एकटेपणा, अभ्यास पेलता येत नसल्याने आलेले नैराश्य हे आत्महत्येची काही प्रमुख कारणे मानली जात आहेत.तरुणाईची सहनशीलता आता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे कुठल्याही कारणाने झालेला विरोध पचवणं त्यांना जड जात आहे. अशात कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी रागाच्या भरात विषप्राशन करणारे बहाद्दरही अनेक आहेत.महाविद्यालयाची चाहूल लागल्यानंतरच प्रत्येकाला आपली ‘परफेक्ट जोडी’ शोधण्याची उत्सुकता असते. मित्र परिवाराच्या मदतीने पाळत ठेवून एखादी आवडली आणि तिने नकार दिला तर युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. दुसरीकडे महाविद्यालयीन ओळखीचे नको इतक्या जवळचे संबंध प्रस्थापित केलेल्या युवतींना नंतर हे नाते पुढे नेता आले नाही तरीही त्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.आत्महत्यापूर्वी मिळतो सोशल संकेततारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेले नैराश्य सोसवतही नाही अन् सांगवतही नाही, असे असते. म्हणूनच कोणीतरी आपल्याला विचारावे, या हेतूने आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाई काही सोशल संकेत देते. व्हॉटस्अ‍ॅप अन् फेसबुकच्या दुनियेत वावरणारी तरुणाई स्टेटस आणि डीपी अपडेट करून काही सुचविते. हे सुचविणे जर मित्रांच्या लक्षात आले तर त्यातून आत्महत्या करण्याचा विचार बाहेर जातो; पण दुर्दैवाने मित्रांनीही जर हे गांभीर्याने घेतले नाही तर मात्र या जगाला माझी गरज नाही, म्हणून ही मुलं आत्महत्या करतात. घरी वावरतानाही ही मुलं कमालीची समंजस्य असल्यासारखे वागतात.ही काही कारणेप्रेम प्रकरणातील अपयशप्रेम संबंधातून निर्माण होणारी बदनामीची भीतीवाईट संगतीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्षमहाविद्यालयात मिळणारी द्वेषकारक किंवा कमीपणाची वागणूकमहाविद्यालयातील वरिष्ठ वर्गातील मुलांकडून होणारे रॅगिंगसाताºयातील काही उदाहरणे१. जावळी तालुक्यातील एका तरुणीने घरात रविवारी तिच्या आवडीचे जेवण केले नाही, या कारणाने पडवीत जाऊन औषध पिऊन आत्महत्या केली. याविषयी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती.. सातारा तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाºया एका युवकाने परीक्षेच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. निकाल लागला तेव्हा हा मुलगा कमी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते.