शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 20:20 IST

Satara Rain : कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

कोयनानगर :  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मिरगाव, ढोकावळे, आंबेघर या गावांवर दरडी कोसळून झालेल्या आपत्तीत १८ हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा पोहचू शकत नसल्याने त्यांना तळमळत रस्त्यातच जीव सोडावा लागत आहे.

कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. काही ठिकाणचे पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे कोयना धरणात उतरून त्याठिकाणाहून मदत देण्याचा प्रयत्न एनडीआरएफचे जवान आणि प्रशासन करत आहे. मात्र, जोपर्यंत रस्ते होत नाहीत. तोपर्यंत या गावांना मदत पोहचविणे शक्य होत नाही. 

गावातील सुमारे साडे तीन हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. मिरगावमधील १५० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, त्यांची जनावरे अजूनही त्याच ठिकाणी आहेत. त्यांना सोडून देण्यासाठी या लोकांना पुन्हा गावात जायचे आहे. मात्र, त्यांना जाता येत नव्हते. शनिवारी संध्याकाळी या गावात जाऊन जनावरांची दावी तोडून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

मिरगाव आणि ढोकावळे याठिकाणी शनिवारी संध्याकाळी जेसीबीच्या मदतीने दरडी आणि मातीचे ढिगारे बाजूला करत मार्ग काढणे सुरु आहे. ढोकावळे येथील १२५ ग्रामस्थांना चाफेर मिरगाव हायस्कूल येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर मिरगावमधील २६० ग्रामस्थांना प्राथमिक शाळेत आणि बाजे येथील गावाच्या बाजूने डोंगराचे कडे तुटल्याने त्यांना कोयनेतील हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले आहे.

ढोकावळे येथील हरीबा रामचंद्र कांबळे, पूर्वा गौतम कांबळे आणि राहीबाई धोंडीबा कांबळे हे तिघेजण मातीत गाडले गेले आहेत. तर सुरेश भांबू कांबले याला ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे. मात्र, उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांसमोरच त्यांनी प्राण सोडला. मृतांवर त्याचठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत.

मिरगावमधील मुक्ता मनोज बाकाडे ( वय १० ) हिचा मृतदेह सापडला आहे. तर वसंत धोंडिबा बाकाडे (५५), कमल वसंत बाकाडे (५०), देवजी बापू बाकाडे (७५), शेवंताबाई देवजी बाकाडे (७०), यशोदा केशव बाकाडे (७०), युवराज जयवंत बाकाडे (५), तर आनंदा रामचंद्र बाकाडे (४९), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१८) व शितल आनंदा बाकाडे (१५) या एकाच कुटुंबातील चौघां जणांचा मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील ६, ढोकावळे येथील ४ तर आंबेघर येथील १० जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात लोकांना वाचवलेएनडीआरएफच्या जवानांनाही दुर्घटनास्थळावर जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. रस्ते करत त्यांना त्याठिकाणी पोहचावे लागत आहे. तरी देखील एनडीआरएफच्या जवानांनी कोयनेच्या बँक वॉटरमध्ये उतरून प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढे धारिष्ट हे फक्त या जवानांमध्येच पाहायला मिळते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSatara Floodसातारा पूरRainपाऊस