शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खचल्याने मदत मिळेना...तळमळत जाताहेत जीव; ५ हजार जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 20:20 IST

Satara Rain : कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

कोयनानगर :  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मिरगाव, ढोकावळे, आंबेघर या गावांवर दरडी कोसळून झालेल्या आपत्तीत १८ हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा पोहचू शकत नसल्याने त्यांना तळमळत रस्त्यातच जीव सोडावा लागत आहे.

कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. काही ठिकाणचे पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे कोयना धरणात उतरून त्याठिकाणाहून मदत देण्याचा प्रयत्न एनडीआरएफचे जवान आणि प्रशासन करत आहे. मात्र, जोपर्यंत रस्ते होत नाहीत. तोपर्यंत या गावांना मदत पोहचविणे शक्य होत नाही. 

गावातील सुमारे साडे तीन हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. मिरगावमधील १५० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, त्यांची जनावरे अजूनही त्याच ठिकाणी आहेत. त्यांना सोडून देण्यासाठी या लोकांना पुन्हा गावात जायचे आहे. मात्र, त्यांना जाता येत नव्हते. शनिवारी संध्याकाळी या गावात जाऊन जनावरांची दावी तोडून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

मिरगाव आणि ढोकावळे याठिकाणी शनिवारी संध्याकाळी जेसीबीच्या मदतीने दरडी आणि मातीचे ढिगारे बाजूला करत मार्ग काढणे सुरु आहे. ढोकावळे येथील १२५ ग्रामस्थांना चाफेर मिरगाव हायस्कूल येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर मिरगावमधील २६० ग्रामस्थांना प्राथमिक शाळेत आणि बाजे येथील गावाच्या बाजूने डोंगराचे कडे तुटल्याने त्यांना कोयनेतील हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले आहे.

ढोकावळे येथील हरीबा रामचंद्र कांबळे, पूर्वा गौतम कांबळे आणि राहीबाई धोंडीबा कांबळे हे तिघेजण मातीत गाडले गेले आहेत. तर सुरेश भांबू कांबले याला ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे. मात्र, उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांसमोरच त्यांनी प्राण सोडला. मृतांवर त्याचठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत.

मिरगावमधील मुक्ता मनोज बाकाडे ( वय १० ) हिचा मृतदेह सापडला आहे. तर वसंत धोंडिबा बाकाडे (५५), कमल वसंत बाकाडे (५०), देवजी बापू बाकाडे (७५), शेवंताबाई देवजी बाकाडे (७०), यशोदा केशव बाकाडे (७०), युवराज जयवंत बाकाडे (५), तर आनंदा रामचंद्र बाकाडे (४९), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१८) व शितल आनंदा बाकाडे (१५) या एकाच कुटुंबातील चौघां जणांचा मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील ६, ढोकावळे येथील ४ तर आंबेघर येथील १० जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात लोकांना वाचवलेएनडीआरएफच्या जवानांनाही दुर्घटनास्थळावर जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. रस्ते करत त्यांना त्याठिकाणी पोहचावे लागत आहे. तरी देखील एनडीआरएफच्या जवानांनी कोयनेच्या बँक वॉटरमध्ये उतरून प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एवढे धारिष्ट हे फक्त या जवानांमध्येच पाहायला मिळते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSatara Floodसातारा पूरRainपाऊस