शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

By नितीन काळेल | Updated: July 26, 2024 13:00 IST

महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान, कोयनेत ८१ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ तर कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर झाला. तर कोयना धरणातील पाणीसाठाही ८१ टीएमसीवर पोहोचला आहे. तरीही सध्या जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातून विसर्ग सुरूच आहे. तर पश्चिमेकडील पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावर बंदी करण्यात आलेली आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवस जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे संततधार होती. अनेक भागात धो-धो पाऊस कोसळल्याने दुर्गम भागातील रस्त्यावर झाडे कोसळली. दरडी पडण्याचेही सत्र सुरूच होते. त्यातच धरणातून विसर्ग आणि ओढे-नाल्यांना पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, गुरूवारी रात्रीपासून पावसाचा जोर मंदावला आहे. शुक्रवारीही प्रमाण कमी राहिले. यामुळे अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. तसेच नियोजित विसर्गही थांबविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास संबंधित धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे १७२ आणि महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७८ हजार ४८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८१.१९ टीएमसी झालेला. सध्या धरण ७७.१४ टक्के भरले आहे. धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि सहा दरावाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोयनेच्या दरवाजातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता. पण, पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने विसर्ग वाढ थांबविण्यात आली आहे.

ठोसेघर, सडा वाघापूर, भांबवली धबधबा बंद..हवामान विभागाने ३० जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि आॅरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्याही पाऊस होत आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार धबधबा तसेच सर्व पाॅईंंट. पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा), सडावाघापूरचा उलटा धबधबा. सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा, जावळी तालुक्यातील एेकीव धबधबा सुरक्षिततेच्या कारणाने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे.

कण्हेरमधील विसर्ग कमी; धोममध्ये ७० टक्के साठा..वाई तालुक्यातील धोम धरणक्षेत्रात पाच दिवस तुफान पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार होता. पण, पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्यातही घट झाली असल्याने पावसाची तीव्रता पाहून आता धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. तर सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातील विसर्ग १० हजारवरुन साडे पाच हजार क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसtourismपर्यटन