शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

By नितीन काळेल | Updated: July 26, 2024 13:00 IST

महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान, कोयनेत ८१ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यात पाच दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला २६७ तर कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर झाला. तर कोयना धरणातील पाणीसाठाही ८१ टीएमसीवर पोहोचला आहे. तरीही सध्या जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातून विसर्ग सुरूच आहे. तर पश्चिमेकडील पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावर बंदी करण्यात आलेली आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवस जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे संततधार होती. अनेक भागात धो-धो पाऊस कोसळल्याने दुर्गम भागातील रस्त्यावर झाडे कोसळली. दरडी पडण्याचेही सत्र सुरूच होते. त्यातच धरणातून विसर्ग आणि ओढे-नाल्यांना पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, गुरूवारी रात्रीपासून पावसाचा जोर मंदावला आहे. शुक्रवारीही प्रमाण कमी राहिले. यामुळे अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. तसेच नियोजित विसर्गही थांबविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास संबंधित धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे १७२ आणि महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७८ हजार ४८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८१.१९ टीएमसी झालेला. सध्या धरण ७७.१४ टक्के भरले आहे. धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि सहा दरावाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोयनेच्या दरवाजातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता. पण, पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने विसर्ग वाढ थांबविण्यात आली आहे.

ठोसेघर, सडा वाघापूर, भांबवली धबधबा बंद..हवामान विभागाने ३० जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि आॅरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्याही पाऊस होत आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार धबधबा तसेच सर्व पाॅईंंट. पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा), सडावाघापूरचा उलटा धबधबा. सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा, जावळी तालुक्यातील एेकीव धबधबा सुरक्षिततेच्या कारणाने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे.

कण्हेरमधील विसर्ग कमी; धोममध्ये ७० टक्के साठा..वाई तालुक्यातील धोम धरणक्षेत्रात पाच दिवस तुफान पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार होता. पण, पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्यातही घट झाली असल्याने पावसाची तीव्रता पाहून आता धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. तर सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातील विसर्ग १० हजारवरुन साडे पाच हजार क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसtourismपर्यटन