शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:28 IST

राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू

सातारा : ‘राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली असल्याने अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढविणार आहे. त्यामुळे राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस न दाखवता सतत पुढे-पुढे ढकलत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सातारा येथे काँग्रेस समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील सरकार राहणार की जाणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदार करायचे आहेत; पण अंतर्गत वादामुळे त्यांची निवड करता येत नाही. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अतिवृष्टीतील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही तेच कळत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरूविकासात राज्य मागे पडत आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. त्यातच सरकारवर विश्वास नसल्याने अनेक प्रकल्प राज्यात येत नाहीत, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ‘काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरत आहे. लवकरच ती संपणार असून, त्यानंतर काँग्रेस देशात ‘हात जोडो’ अभियान सुरू करत आहेत. महाराष्ट्रातही या अभियानाची तयारी सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक