शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:28 IST

राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू

सातारा : ‘राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली असल्याने अस्थिर परिस्थिती आहे. त्यातच स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र येऊन लढविणार आहे. त्यामुळे राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धाडस न दाखवता सतत पुढे-पुढे ढकलत आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सातारा येथे काँग्रेस समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील सरकार राहणार की जाणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. राज्यपाल नियुक्त १२ आमदार करायचे आहेत; पण अंतर्गत वादामुळे त्यांची निवड करता येत नाही. त्यातच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अतिवृष्टीतील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही तेच कळत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरूविकासात राज्य मागे पडत आहे. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. त्यातच सरकारवर विश्वास नसल्याने अनेक प्रकल्प राज्यात येत नाहीत, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ‘काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरत आहे. लवकरच ती संपणार असून, त्यानंतर काँग्रेस देशात ‘हात जोडो’ अभियान सुरू करत आहेत. महाराष्ट्रातही या अभियानाची तयारी सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक