शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा: गुडघाभर पाण्यातूनच शेतकऱ्याने काढली बाजरीची कणसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:21 IST

पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल

तरडगाव : परतीच्या पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात ओढ्या नाल्याला आलेल्या पुरात एकच जण वाहून गेल्याचीही घटना घडली. यासर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले असून बाजरी पिकाची काढणी करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिंदेमाळ परिसरातील एका शेतकऱ्याने तर पाऊस थांबत नसल्याने चक्क गुडघाभर पाण्यातच बाजरीची कणसे काढण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले.        परिसरात बऱ्याच ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू केले गेले नसल्याने शेतकऱ्यामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी होवू नये यासाठी अशा बिकट अवस्थेत देखील शेतातून बाजरीची कणसे सुरक्षित ठिकाणी कशी पोहचविता येतील यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी